ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ - अभिनेत्री नर्गिस फाखरी आणि उदय चोप्रा यांनी परस्परांच्या प्रेमात असल्याची कधीही जाहीरपणे कबुली दिली नसली तरी, त्यांच्यामध्ये प्रेमाचा अंकुर फुलला होता. माध्यमांची नजर चुकवून सुरु असलेले हे प्रेमसंबंध आता संपुष्टात आल्याची चर्चा आहे. उदय आणि नर्गिसचे नाते इतके ताणले गेले की, नर्गिसला यामुळे नैराश्याचा झटका आला होता असे वृत्त आहे.
'अझर' सिनेमामुळे पुन्हा एकदा नर्गिस चर्चेत आली आहे. 'अझर'मध्ये तिने संगीता बिजलानीची भूमिका केली आहे. डीएनच्या वृत्तानुसार उदय चोप्रा नर्गिस बरोबर विवाह करण्यासाठी अत्यंत गंभीर होता. पण त्यावेळी नर्गिसला तिच्या करीयवर लक्ष द्याचे होते. वेळेबरोबर नर्गिसचा प्राधान्यक्रम बदलला तिने करीयरपेक्षा आपल्या व्यक्तिगत आयुष्याला प्राधान्य दिले.
पण तो पर्यंत उदयचे मन बदलले होते. त्याने नर्गिसशी लग्न करण्याचा आपला निर्णय बदलला. नर्गिसला उदयच्या या वागण्याचा इतका त्रास झाला की, तिला नैराश्याचा झटका आला होता.