Join us

गोव्यात विराट-अनुष्का भेटले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2016 10:03 IST

सेलिब्रिटींचं ब्रेकअप आणि पॅचअप हे आता कॉमन झालेयं...केव्हाही ब्रेकअप घेतात अन् केव्हाही एकत्र दिसतात. सेलिब्रिटींच्या पॅचअपवर आता चाहत्यांचा विश्वास ...

सेलिब्रिटींचं ब्रेकअप आणि पॅचअप हे आता कॉमन झालेयं...केव्हाही ब्रेकअप घेतात अन् केव्हाही एकत्र दिसतात. सेलिब्रिटींच्या पॅचअपवर आता चाहत्यांचा विश्वास उरला नाही. त्यांच्या अशा वागण्याचं ताजं उदाहरण म्हणजे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा. त्यांनी ब्रेकअप घेतलाय असे सर्वांना वाटत असतानाच ते नुकतेच एकत्र भेटलेले दिसले. तुमचा विश्वास बसणार नाही यावर पण हे अगदी खरंय!!गोव्यात नुकतीच ‘आयएसएल’ ही फुटबॉल मॅच आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते दोघे एकत्र बसलेले असताना त्यांना माध्यमांनी हेरले. आणि मग काय?  ते माध्यमांच्या क्लिकमधून थोडेच वाचणार? विशेष म्हणजे ते दोघेही एकमेकांसोबत ती मॅच ‘फुल टू एन्जॉय’ करताना दिसले. वेल, ते दोघे एकत्र आले तर आपल्याला आनंदच होणार आहे नाही का? अनुष्का शर्मा हिच्या मुख्य भूमिकेतील ‘ऐ दिल हैं मुश्किल’ चित्रपटाला  बॉक्स आॅफिसवर भरघोस प्रतिसाद मिळतोय. अनुष्का-रणबीर यांच्या जोडीला चाहत्यांकडून लाईक्स मिळत आहेत. कुणालाही हेवा वाटावा अशी मैत्री या दोघांमध्ये चित्रीत करण्यात आली आहे.