Join us

twitterवर आमीरला विरोध : दंगल’वर बहिष्कार टाकण्याची भाषा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2016 17:38 IST

आमीर खान याने गतवर्षी असहिष्णुतेबद्दल विधान केले होते. यावरून चांगलाच वाद उफाळला होता. कालांतराने हा वाद थंड झाला होता. ...

आमीर खान याने गतवर्षी असहिष्णुतेबद्दल विधान केले होते. यावरून चांगलाच वाद उफाळला होता. कालांतराने हा वाद थंड झाला होता. पण आमीरचा आगामी चित्रपट ‘दंगल’चे पोस्टर रिलीज होताच, या वादाला पुन्हा तोंड फुटले आहे. twitterवर ‘दंगल’च्या बहाण्याने काही लोकांनी आमीरला लक्ष्य करणे सुरु केले आहे. ‘दंगल’वर बहिष्कार घालण्याची भाषा केली जात आहे. सोमवारी आमीरने ‘दंगल’चे पोस्टर रिलीज केले आणि यानंतर दुसºयाच दिवसापासून twitterवर ‘दंगल’व आमीरचा विरोध सुरु झाला. सोशल मीडियावर # देशद्रोहीचा दंगल ट्रेन्डमध्ये आहे.  काही twitter युजर्सने आमीर व त्याची पत्नी किरण या दोघांना देश सोडून जाण्याचा सल्ला दिला आहे तर काहींनी आमीरच्या चित्रपटावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे. 
@CS_Ruchi- U stil in India? @amirkingkhan felt not so safe here?boycott #देशद्रोही_का_दंगल Moral responsibility of every Indian
 
@PandeyShivya- His wife was afraid to live in the country. Let them choose the country they want to release their movie n earn money #देशद्रोही_का_दंगल
 
@DrSStrangee- #देशद्रोही_का_दंगल After dilwale & fan New project is for us, this is traitor's dangal.. Say no to traitor's movie
 
@nikhildadhich- इस देश में @aamir_khan और उसकी बीवी को डर लगता है, असहिष्णुता नजर आती है। देश के अपमान का सबक सिखाओ गद्दार को
 
‏@WorldRulerIndia- Boycott Dangal. Boycott all khan movies.Destroy dawood funded bollywood #देशद्रोही_का_दंगल @aamir_khan
 
@aazad007- Earning from India, Fame From India, Respect from India then abusing India #BoycottDangal #देशद्रोही_का_दंगल
 
@Aakash3297- I was a big fan of @aamir_khan once but mulla aakhir mulla hi hota hai #देशद्रोही_का_दंगल
 
@badri- #देशद्रोही_का_दंगल. If Aamir Khan feels India intolerant,he shud stop his movie release here n go to tolerant Syria.
 
@Reetesh777- मैं और मेरा परिवार दंगल देखने नही जाएंगे। इससे अच्छा किसी भूखे को खाना खिला देंगे और आप? #देशद्रोही_का_दंगल
काय आहे प्रकरणगतवर्षी उत्तर प्रदेशातील दादरी येथे गोमांस ठेवण्याच्या संशयावरून एका इसमाची हत्या झाली होती. यानंतर कन्नड लेखक कलबुर्गी यांची हत्या झाली होती. यानंतर देशात असहिष्णुता वाढल्याचा आरोप करीत काही साहित्यिकांनी आपआपले पुरस्कार परत केले होते. अनेक लेखक, चित्रपटसृष्टीतील दिग्गज, शास्त्रज्ञ आदींनी वाढत्या असहिष्णुतेचा विरोध केला होता. आमीर खान यानेही एका पुरस्कार वितरण सोहळ्यादरम्यान या मुद्यावर बयान दिले होते. ‘माझ्या मुलासंदर्भात प्रथमच मला भय वाटू लागले आहे. देशातील सध्याचे वातावरण बघून माझी पत्नी किरण तर अगदीच मोठी आणि हादरवून टाकणारी गोष्ट बोलली होती. आपण देश सोडायला हवा का, असा प्रश्न तिने मला केला होता. मुलाच्या सुरक्षेसंदर्भात मी साशंक होती’ अशा आशयाचे विधान आमीरने केले होते. यानंतर त्याच्या या विधानावरून चांगलाच वाद निर्माण झाला होता. अर्थात आमीरने माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा खुलासा केला होता.