टिवंकल खन्ना बर्थडे स्पेशल : ‘खिलाडी’ची प्रेरणा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2016 11:31 IST
आज टिवंकल खन्ना हिचा वाढदिवस.. तिला ‘सीएनएक्स मस्ती’ टीमकडून हार्दिक शुभेच्छा.. अक्षयकुमार आणि टिवंकल खन्ना यांच्या बॉलिवूडमधील एन्ट्रीपासून ते आत्तापर्यंतच्या प्रवासाबद्दल थोडंसं....
टिवंकल खन्ना बर्थडे स्पेशल : ‘खिलाडी’ची प्रेरणा !
लव्हर बॉय, मार्शल आर्ट्स एक्सपर्ट, सुपरस्टार, खिलाडी अशी विशेषणं जिंकणारा एकमेव अभिनेता म्हणजे अक्षय कुमार. चित्रपटांमध्ये स्टंटबाजी करून प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अक्षय कुमार ग्लॅमर जगताचा बादशाह तर आहेच पण एक आदर्श पती, प्रेमळ वडीलदेखील आहे. पण, तुम्हाला हे माहितीये का? अक्षय कुमार त्याच्या या यशाचं श्रेय कुणाला देतोय ? त्याची पत्नी, अभिनेत्री, टॅलेंटेड ब्लॉगर, डिझायनर, उत्तम होममेकर, लेखिका टिवंकल खन्ना हिला. अक्षय कुमार आणि टिवंकल खन्ना हे कपल बॉलिवूडचं सर्वांत रोमँटिक कपलपैकी एक समजलं जातं. त्यांच्यात प्रेम कसं फुललं? ते कुठे भेटले? त्याची लव्हस्टोरी काय? असे प्रश्न आपल्याला त्यांचे चाहते म्हणून पडणे अपेक्षित आहे. आज टिवंकल खन्ना हिचा वाढदिवस.. तिला ‘सीएनएक्स मस्ती’ टीमकडून हार्दिक शुभेच्छा.. अक्षयकुमार आणि टिवंकल खन्ना यांच्या बॉलिवूडमधील एन्ट्रीपासून ते आत्तापर्यंतच्या प्रवासाबद्दल थोडंसं जाणून घेऊया... कसं फुललं प्रेम...! बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यापूर्वी बँकॉकच्या एका हॉटेलमध्ये अक्षयकुमार वेटर आणि एक उत्तम कुक होता. त्याचवेळी टिवंकल बॉलिवूडमध्ये तिच्या डेब्यूसाठी प्रयत्न करत होती. १९८७ मध्ये दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या ‘आज’ चित्रपटात अक्षयने एक साधारण भूमिका केली. १९९० पर्यंत त्याने ‘खिलाडी’ चा प्रवास पूर्ण केला. टिवंकलने १९९५ मध्ये दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्या ‘बरसात’ चित्रपटातून बॉबी देओलसोबत डेब्यू केला. ‘बरसात’ हा त्याकाळचा एक हिट चित्रपट ठरला. मुंबईत ‘फिल्मफेअर मॅगझीन’चे शूटिंग सुरू असताना हे दोघे भेटले. तेव्हा पाहताक्षणीच अक्की टिवंकलच्या प्रेमात पडला. तेव्हापासून ते आजपर्यंत ते एकमेकांसोबत एखाद्या परफेक्ट कपलप्रमाणे सोबत असतात. लग्नासाठी अशीही अट...अक्षयच्या आयुष्यात काही सरळ साधं असू शकतं का? नाही ना. आता तुम्हाला वाटेल की, ‘लव्ह अॅट फर्स्ट साईट’ झाल्यावर त्याने तिच्याशी लग्न केले असेल. पण, टिवंकल १९९०- २००० पर्यंत बॉलिवूडमध्ये एक हिट अभिनेत्री होती. तिचं मन जिंकणं एवढं सोप्पं काम नव्हतं. पण, ती देखील त्याच्याकडे त्याच्यातील स्मार्टनेस, आत्मविश्वास, कलाकार या गुणांमुळे आकर्षित झाली होती. मात्र, लग्नाचा योग एका अटीमुळे जुळून आला. ‘त्या’ अटीबद्दल सांगताना अक्की म्हणाला,‘२००० यावर्षी टिवंकलचा ‘मेला’ हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. ती त्या चित्रपटाकडून खुप अपेक्षा ठेऊन होती. ती त्याला म्हणाली की, हा चित्रपट जर बॉक्स आॅफिसवर चांगली कमाई करू शकला नाही तर मी तुझ्याशी लग्न करेन आणि नेमकं तसंच झालं. चित्रपट बॉक्स आॅफिसवर फ्लॉप झाला अन् त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मोजक्या पाहुण्यांच्या साक्षीत ‘ते’ विवाहबद्ध : डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या निवासस्थानी ७ जानेवारी २००१ यादिवशी दोघे विवाहबद्ध झाले. केवळ दोन तासांचा हा सोहळा आणि ५० आप्तेष्टांच्या उपस्थितीत विवाह सोहळा संपन्न झाला. बॉलिवूड अभिनेता आमिर खान, अमर सिंग, धर्मेश दर्शन आणि बरेच पाहुणे यावेळी हजर होते. उपस्थित सर्वांना त्यांनी लग्न केले आहे की ही बाब पचवायलाच बराच कालावधी गेला. ‘ती’ माझी ‘सुपरवुमन’!अक्कीचे टिवंकलवर किती प्रेम आहे हे काही वेगळे सांगायला नकोच. अक्षयकुमार आज एवढ्या उंचीवर आहे याचे सर्व श्रेय तो त्याची पत्नी टिवंकल खन्ना हिलाच देतो. पाठिंबा, प्रेम, सहकार्य यांच्यामुळे त्याने आज नाव कमावले आहे. तिने तिचे करिअर एक अभिनेत्री म्हणून सुरू केले. पण, इंटेरिअर डेकोरेटर, होममेकर, आरव आणि नितारा यांची प्रेमळ आणि काळजी करणारी आई, पाठिंबा देणारी पत्नी म्हणून आज तिला तिचे प्रोफाईल सांगावे लागतेय. ती खरंच एक ‘सुपरवुमन’ आहे, असे अक्षय मानतो. त्यांच्या नात्यामागील एक गुपित म्हणजे त्यांचा एकमेकांवर असलेला विश्वास आणि प्रेम. टिवंकलबद्दल अक्कीची समर्पण भावना : पती-पत्नीचं नातं हे एकमेकांबद्दल प्रेम, विश्वास, आपुलकी, जिव्हाळा देणारं असतं. अक्षय-टिवंकल यांच्या नात्यातील समर्पण आदर्श जोडप्याप्रमाणं आहे. पत्नीला पतीकडून केवळ एवढीच अपेक्षा असते की, पतीने त्याचं तिच्यावर किती प्रेम आहे ते सर्वांसमोर दाखवावं. नेमकं तेच अक्षयने ओळखलं आणि त्याच्या ‘स्पेशल २६’ चित्रपटाच्या म्युझिक लाँच सोहळ्यावेळी केलं. त्याने पत्रकार परिषदेवळी तिच्यासाठी एक गाणं सर्वांसमोर गुडघ्यावर बसून तिच्याकडे पाहत गायलं. मग काय? टिवंकलचा आनंद गगनातच मावेनासा झाला. उपस्थितांच्या डोळयांतील आनंद आणि हसू पाहून तिला स्वत:चाच अभिमान वाटला. काही प्रसिद्ध गाणी :* तेरी अदाओं पे मरता हूँ * हम तो दिवाने हूए यार.. * साथी मेरे तेरे बिना.. * हमको सिर्फ तुमसे प्यार हैं * मोहब्बत हो गई हैं