१८ जून १९९९ रोजी प्रदर्शित झालेल्या 'हम दिल दे चुके सनम' (Hum Dil De Chuke Sanam Movie) चित्रपटातील सलमान खान (Salman Khan) आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांच्या प्रेमकथेची खूप चर्चा झाली होती. यात अजय देवगण(Ajay Devgan)नेदेखील वनराजच्या भूमिकेतून रसिकांचे लक्ष वेधून घेतले होते. 'हम दिल दे चुके सनम' हा चित्रपट २५ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. आजही हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. पण तुम्हाला माहित आहे का, या चित्रपटात नंदिनीच्या भूमिकेसाठी ऐश्वर्या रायला पहिली पसंती नव्हती.
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटात माधुरी दीक्षितला मुख्य अभिनेत्री म्हणून घेऊ इच्छित होते. माधुरीला तारखांची समस्या होती. माधुरीने नकार दिल्यानंतर दुसऱ्या नायिकेचा शोध सुरू झाला. या काळात संजय लीला भन्साळी यांनी ऐश्वर्याला कुठेतरी पाहिले आणि ती त्यांच्या चित्रपटाची नायिका असल्याचे ठरवले.
ऐश्वर्या रायने आधीच मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता आणि तमीळ चित्रपटांमध्ये यशस्वी झाली होती. हिंदी चित्रपटांमध्ये यश अजून येणे बाकी होते. चित्रपट समीक्षकांनी ऐश्वर्याच्या स्मितचे वर्णन प्लास्टिक स्माइल असे केले होते. या परिस्थितीत संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्या चित्रपटात ऐश्वर्या रायला कास्ट करण्याचा धोका पत्करला. त्यानंतरची कहाणी इतिहास जमा झाली. हा चित्रपट प्रचंड हिट झाला. मात्र, त्यानंतर सलमान आणि ऐश्वर्या राय यांनी कधीही कोणत्याही चित्रपटात एकत्र मुख्य भूमिका साकारली नाही.