स्वरा भास्कर बनली लेखिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2016 13:19 IST
स्वराने एक सुंदर प्रेम कहानी लिहीली आहे. ही पटकथा प्रेमावर आधारित असून, यामध्ये एक मुलगी व दोन मुलांच्या भूमिका ...
स्वरा भास्कर बनली लेखिका
स्वराने एक सुंदर प्रेम कहानी लिहीली आहे. ही पटकथा प्रेमावर आधारित असून, यामध्ये एक मुलगी व दोन मुलांच्या भूमिका आहेत. तनु वेडस मनु रिटर्न्सच्या अभिनेत्रीने सांगितले की, स्वराने ही पटकथा लिहणे सुरु केले असून, यामध्ये मुख्य पात्र एका महिलेचे आहे. पुरुषाची भूमिका अधिक मनोरंजन करणारी असणार आहे. स्वरा वॉयसेस फे लोशिप फोर स्क्रीनराइटर्सच्या तिसºया संस्करणाची भाग राहिलेली आहे. यंदाचा हा कार्यक्रम काही निवडक कथेवर होता. त्यामध्ये स्त्री- पुरुष संवेदनशील मुद्दे, महिलांचे प्रश्न व भूमिकेला जागा देण्यात आली होती. चित्रपटात आपल्याला भूमिका मिळावी. याकरिताच तिने ही पटकथा लिहीणे सुरु केल्याचे प्रेम रतन धन पायोच्या अभिनेत्रीने सांगितले.