Salman Khan: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान केवळ त्याच्या अभिनयासाठीच नाही, तर त्याच्या रोखठोक बोलण्यासाठीदेखील ओळखला जातो. आताही तो एका एका वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो'च्या (The Great Indian Kapil Show 3) तिसऱ्या सीझनच्या पहिल्या भागात पाहुणा म्हणून आलेल्या सलमानने विवाह आणि घटस्फोटासंदर्भात केलेलं वक्तव्य सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये सलमान खान म्हणतो, "पूर्वीचे लोक कितीही वाद झाले तरी सगळं विसरून एकत्र राहायचे. एकमेकांना समजून घेण्याची त्यांची मानसिकता होती. पण आता लगेच घटस्फोट होतो. अगदी छोट्याशा गैरसमजातूनही घटस्फोट होतो. घटस्फोटानंतर ती अर्धे पैसे घेऊन निघूनही जाते", असं त्यानं म्हटलं. त्याचं हे विधान ऐकून सिद्धू, अर्चना पूरण सिंह आणि उपस्थित प्रेक्षक हासून लोटपोट झाले. मात्र सलमानचं हे वक्तव्य विनोदाच्या अंगाने होतं की त्यामागे काही व्यक्तिगत संदर्भ आहे, हे मात्र स्पष्ट झालं नाही.
२१ जूनपासून सुरू होणार नवीन सीझन'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो' चा हा तिसरा सीझन २१ जूनपासून दर शनिवारी रात्री ८ वाजता नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार आहे. या सीझनमध्ये एक खास गोष्ट म्हणजे जवळपास पाच वर्षांनंतर नवज्योत सिंह सिद्धू पुन्हा एकदा परीक्षकाच्या भूमिकेत झळकणार आहेत. सिद्धू यांच्यासोबत अर्चना पूरण सिंह, कपिल शर्मा, सुनील ग्रोव्हर, कृष्णा अभिषेक आणि किकू शारदा हे हास्यकलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज आहेत.