Join us  

लग्नानंतर बदलले रणवीर सिंगचे आयुष्य! चुकूनही टाळू शकत नाही ‘या’ तीन गोष्टी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 6:00 AM

लग्नानंतर आयुष्य बदलणारचं. रणवीरशी लग्न करून दीपिकाचे आयुष्य कसे व किती बदलले, ते ठाऊक नाही. पण दीपिकाशी लग्न केल्यानंतर रणवीरच्या आयुष्यात काही गोष्टी मात्र नक्कीच बदलल्यात.

ठळक मुद्देलग्नापूर्वी दीपिकासोबतच्या लव्हस्टोरीवरही रणवीर यावेळी बोलला. दीपिकासोबत अगदी काही क्षण घालवला यावेत म्हणून अनेक तासांचा प्रवास करून पोहोचायचो, असे रणवीरने सांगितले.

रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांचे लग्न २०१८ मधील सर्वाधिक शाही विवाह सोहळा होता, यात शंका नाही. या लग्नाकडे अख्ख्या देशाच्या नजरा होत्या. कदाचित त्याचमुळे दीपवीरने दूर इटलीत लग्नगाठ बांधली. केवळ ३० पाहुण्यांच्या उपस्थितीत दीपवीर एकमेकांचे झालेत. यानंतर दोघेही भारतात परतले आणि दीड महिना रिसेप्शन आणि रिसेप्शन रंगले. आता मात्र रणवीर व दीपिका दोघेही आपआपल्या कामावर पतरले आहेत. पण लग्नानंतर आयुष्य  बदलणारचं. रणवीरशी लग्न करून दीपिकाचे आयुष्य कसे व किती बदलले, ते ठाऊक नाही. पण दीपिकाशी लग्न केल्यानंतर रणवीरच्या आयुष्यात काही गोष्टी मात्र नक्कीच बदलल्यात.

होय, अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत रणवीर यावर बोलला. लग्नानंतर कुठल्या तीन गोष्टी करण्यास तुला मनाई करण्यात आलीय? असा प्रश्न या मुलाखतीत रणवीरला विचारला गेला. यावर रणवीरने चांगलेच मजेशीर उत्तर दिले. त्याने सांगितले की, पहिली गोष्ट म्हणजे, मी रात्री उशीरापर्यंत घराबाहेर राहू शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, मी काहीतरी खाल्याशिवाय घर सोडू शकत नाही आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मी बायकोचा कॉल मिस करू शकत नाही.

लग्नापूर्वी दीपिकासोबतच्या लव्हस्टोरीवरही रणवीर यावेळी बोलला. दीपिकासोबत अगदी काही क्षण घालवला यावेत म्हणून अनेक तासांचा प्रवास करून पोहोचायचो, असे रणवीरने सांगितले. फक्त काही क्षणांसाठी...? असा उलट प्रश्न केल्यावर माझ्यासाठी ते काही मिनिटंच पुरेसे होते, असे रणवीर म्हणाला. मी ‘हसबण्ड आॅफ द मिलेनियम’ बनणार, असा दावाही त्याने केला.

टॅग्स :रणवीर सिंगदीपिका पादुकोण