Join us

‘काका’च नव्हे; बिग बी, भाईजानवरही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2016 14:13 IST

निशाणाबॉलिवूडमध्ये ‘काका’ या नावाने परिचित असलेले दिवगंत सुपरस्टार राजेश खन्ना हे इंडस्ट्रीमधील अतिशय कमजोर अ‍ॅक्टर असल्याची टीका करून अभिनेता ...

निशाणाबॉलिवूडमध्ये ‘काका’ या नावाने परिचित असलेले दिवगंत सुपरस्टार राजेश खन्ना हे इंडस्ट्रीमधील अतिशय कमजोर अ‍ॅक्टर असल्याची टीका करून अभिनेता नसीरूद्दीन शाह यांनी वाद निर्माण केला होता. आता पुन्हा त्यांनी सोशल मीडियावर अ‍ॅक्टीव्ह असलेल्या स्टार्सना लक्ष करीत विचारांमधील परिपक्वता स्वत:पर्यंतच मयार्दीत ठेवा, असा सल्ला देत नव्या वादाला निमंत्रण दिले आहे. ‘अ‍ॅण्ड देन वन डे’ या त्यांच्या मराठी अनुवादीत आत्मकथेच्या प्रकाशनप्रसंगी त्यांनी अनेक बॉलिवूड स्टार्सवर आगपाखड केली. ‘कलाकारांनी आपल्या कामातून स्वत:ला सिद्ध करायला हवे. उगाचच प्रसिद्धीचा हव्यास करून सोशल मीडियावर स्वत:चे विचार मांडू नये. कलाकारांच्या विचाराला कोणीही गांभीर्याने घेत नाही’ अशा शब्दात त्यांनी अनेकांवर निशाना साधला. नसीरूद्दीन शाह यांचे हे वक्तव्य अनेकांना झोंबणारे असल्याने येत्या काळात त्यावर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यापूर्वी देखील त्यांनी अमिताभ बच्चन,  सलमान खान, फरहान अख्तर, अनुपम खैर यासारख्या सुपरस्टार्सवर टीका करून वाद निर्माण केला होता.अमिताभ रियल नाहीतवादग्रस्त वक्तव्य करून कॉन्ट्रोव्हर्सी निर्माण करणारे नसीरुद्दीन शाह यांनी अमिताभ बच्चन यांच्याविषयी सुद्धा वादग्रस्त वक्तव्य करून वाद ओढवून घेतला होता. एका मुलाखतीत त्यांनी अमिताभवर निशाना साधता होता. ‘सुपरस्टार दिलीपकुमार चित्रपटात पूर्णपणे योगदान देण्यासाठी ओळखले जात होते. मात्र अमिताभ बच्चन यांची अशी ओळख नाही.  चित्रपटांची चॉईस करण्याच्या कारणांमुळे अमिताभ भविष्यात स्मरणातदेखील ठेवले जाणार नाहीत. कारण, खरे टॅलेंट चित्रपट चॉईस करण्यातच दडलेले असते,’ असे ते म्हणाले होते. अन्य एका मुलाखतीतही त्यांनी अमिताभवर निशाना साधला होता. ‘स्टार तोच असतो जो ४०-५०च्या वयात स्वत:ला सिंथेटिक बनविण्याच्या कलेत दंग होतो. अमिताभ या कलेत अजिबात परफेक्ट नाहीत, कारण ते त्यांच्या रियल लाईफमध्ये कधील रियल होऊ शकत नाहीत,’ असे ते म्हणाले होते. नसीरुद्दीन यांच्या या वक्तव्यानंतर ते टीकेचे धनी ठरले होते.अनुपम म्हणजे विस्थापित सिटीझनखरं तर अनुपम खेर आणि नसीरुद्दीन शाह यांच्यातील मैत्री सर्वश्रुत आहे. ‘वेइनेस-डे’ या चित्रपटातील दोघांची केमिस्ट्री चर्चेचा विषय ठरली होता. मात्र, काश्मीर मुद्द्यावरून दोघांमधील जुगलबंदीही चांगलीच गाजली होती. एका कार्यक्रमादरम्यान नसीरुद्दीन शाह यांनी अनुपम खेर यांच्यावर निशाना साधला होता. ‘जी व्यक्ती कधी काश्मीरमध्ये राहिलीच नाही, ती काश्मिरी पंडितांसाठी लढाई पुकारते. अचानकच तो एक विस्थापित सिटिझन कसा काय झाला?’, अशा शब्दांत त्यांनी टीकास्त्र सोडले होते. अनुपम खेर यांनीदेखील याला जसेच्या तसेच उत्तर दिले. होते. ‘शाह साहब की जय हो! मग, तुमच्या लॉजिकनुुसार एनआरआयनेदेखील कधी देशाविषयी विचार करू नये,’ असे त्यांनी लिहिले होते. त्या वेळी दोघांमधील हे कोल्ड वॉर चांगलेच गाजले होते. सलमानवरही आगपाखडउत्तर प्रदेशात आयोजित केलेल्या सॅफई महोत्सवात जेव्हा सलमानने स्टेज परफॉर्म केला होता, तेव्हा नसीरुद्दीन शाह यांनी त्याच्यावर सडकून टीका केली होती. ‘मोठ्या स्टारची कुठलीच राजनैतिक विचारधारा नसते. तुम्हाला माहीत असायला हवे, की उत्तर प्रदेश या राज्याची काय स्थिती आहे? मला नाही वाटत, की कुठलाही अ‍ॅक्टर परफॉर्मन्सकरिता मिळालेला पैसा चॅरिटीसाठी खर्च करेल. कोणी याबाबत विचारदेखील करू शकणार नाही,’ अशा शब्दांत नसीरुद्दीन शाह यांनी सलमानचा समाचार घेतला होता. सलमानने मात्र नसीरूद्दीन यांच्या या  वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. सलमानचे पिता सलीम खान यांनी मात्र अलीकडे नसीरुद्दीन शाहचा समाचार घेत, राजेश खन्ना यांना मिळालेला सुपरस्टार हा दर्जा क्वॉलिटीविना मिळत नसल्याचे ठणकावून सांगितले. मिल्खा नव्हे स्ट्रीट फायटरबॉक्स आॅफिसवर सुपरहिट ठरलेल्या ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटावरदेखील  दुंबईमधील एका इव्हेंटदरम्यान नसीरुद्दीन शाह यांनी सडकून टीका केली होती. ‘केवळ चांगल्या फोटोग्राफीने चित्रपट चांगला ठरविला जात नसतो. आता ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटाचेच उदाहरण घ्या. हा चित्रपट पूर्णत: खोटा आहे. फरहानला मिल्खासारखे दिसण्यासाठी वजन कमी करणे गरजेचे होते. कारण चित्रपटात फरहान मिल्खाऐवजी ब्रॅड पिटसारखा स्ट्रीट फायटर दिसत आहे. वास्तविक, त्याने चित्रपटासाठी प्रचंड  मेहनत घेतली; परंतु सर्वच अ‍ॅँगलनी हा चित्रपट खोटा वाटतो,’असे नसीरुद्दीन म्हणाले होते.