Join us  

माझ्या नवऱ्याची गर्लफ्रेंड...! बॉलिवूडच्या या अभिनेत्याचे होते विवाहबाह्य संबंध, पत्नींनी केला होता कानाडोळा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2020 5:13 PM

नवऱ्यांचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असतानाही या बॉलिवूड अभिनेत्यांच्या पत्नींनी लग्न तुटू दिले नाही.

कित्येक असे कलाकार आहेत ज्यांचे विवाहित जीवनात बरेच चढउतार आले आहेत. अशात काहींनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला तर काहींनी आपले नाते वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. काही अभिनेत्यांच्या पत्नींनी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सांभाळलेही आणि आपल्या नवऱ्यांना योग्य मार्गावर आणले.

राज कपूर आणि नरगिस यांची प्रेम कहाणी चित्रपटाच्या इतिहासातील सर्वात चर्चित आहे. त्यांचे नाते नेहमी इतिहासातील सोनेरी पानांमध्ये सहभागी आहे. राज कपूर यांचे नरगिस यांच्यावर खूप प्रेम होते. मात्र या नात्याला नाव देऊ शकले नाही कारण ते विवाहित होते. राज कपूर यांचे लग्न १९४६ साली कृष्णा मल्होत्रा यांच्यासोबत झाले होते. हे अरेंज मॅरेज होते. लग्नानंतर त्यांचे नरगिसवर प्रेम जडले होते. मात्र प्रेमापुढे राज कपूर विवाह बंधन तोडू शकले नाही आणि प्रेम कहाणी अपूर्ण राहिली. त्यानंतर राज कपूर यांचे नाव वैजंयती माला आणि झीनत अमान यांच्यासोबतही जोडले गेले होते. मात्र ते आयुष्यभर कृष्णा यांच्यासोबतच राहिले.

अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या प्रेमांचे किस्से अनेकांना माहित आहे. अशा कठीण काळात जया बच्चन यांनी मोठ्या हिंमतीने परिस्थितीचा सामना केला होता आणि नात्यात आलेल्या वादळाचा सामना केला होता. शेवटी जया बच्चन यांच्या प्रयत्नांना यश आले आणि अमिताभ बच्चन यांचे रेखा यांच्यासोबत असलेल्या नात्याला पूर्ण विराम लागला.

आदित्य पांचोलीचे लग्न अभिनेत्री जरीना वहाबसोबत झाले होते. मात्र लग्नानंतर त्यांचे कंगना राणौतवर जीव जडला होता. कंगना राणौतसोबत आदित्य पांचोलीच्या अफेयरच्या चर्चा झाल्या होत्या. मात्र कंगना राणौतच्या तीव्र टीकेनंतर आदित्य पांचोली पूर्णपणे कोलमडून गेला होता. तेव्हा त्याची पत्नी जरीना वहाबने पुढे येत त्याची साथ दिली आणि त्याला अडचणीतून बाहेर काढले. आज ते खूप चांगले जीवन व्यतित करत आहे.

अभिनेता राज बब्बरने नादिरा बब्बरसोबत लग्न केले होते. त्यानंतर त्यांचा जीव अभिनेत्री स्मिता पाटीलवर जडला. त्यांनी प्रेमासाठी लग्नदेखील तोडले. मात्र स्मिता पाटील यांची साथ फार कमी काळ लाभली. वयाच्या ३१ व्या वर्षी एका गंभीर आजार झाला आणि त्यांचे निधन झाले. स्मिता यांच्या निधनानंतर राज बब्बर पूर्णपणे कोलमडून गेले होते. अशा काळात त्यांच्या पहिल्या पत्नीने त्यांना सांभाळले होते. वेळेसोबतच राज बब्बर सावरले आणि त्यांच्या पहिल्या पत्नीकडे परतले.

प्रसिद्ध अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांचे लग्नानंतर अभिनेत्री रीना रॉय यांच्यासोबत अफेअर होते. या दोघांच्या अफेअरचे किस्से खूप चर्चेत आले होते. मात्र त्यांचे नात्याचा लवकरच दी एण्ड झाला आणि पुन्हा शत्रुघ्न सिन्हा आपल्या पत्नीकडे परत आले.

बॉलिवूड अभिनेता गोविंदा एकेकाळी अभिनेत्री नीलमसोबत रिलेशनशीपमध्ये होता. त्यावेळी त्यांच्या अफेअरच्या खूप चर्चा रंगल्या होत्या. मात्र धक्कादायक बाब ही होती की गोविंदाने नीलमला त्याच्या लग्नाबद्दल सांगितले नव्हते. त्यावेळी गोविंदाची पत्नी सुनीताने त्याच्या गोविंदाच्या एक्स्ट्रा मॅरिटल नात्यावर खूप समजूतदारपणे वाईट काळाचा सामना केला होता. अखेर गोविंदा आपल्या विवाहित आयुष्यात बिझी झाला.

किंग खान शाहरूख आणि गौरी खान यांचे लव्ह मॅरिज झाले आहे. त्या दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे. मात्र त्यांच्या लग्नात वादळ आले होते की जेव्हा शाहरूखचे नाव प्रियंकासोबत जोडले गेले होते.असे म्हटले जाते की गौरी खानने नवऱ्याच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरला सक्तीने घेतले आणि शाहरूखला चांगलाच दम भरला. त्यानंतर शाहरूखच्या या कथित अफेअरला ब्रेक लागला.असेही सांगितले जाते की शाहरूखला भविष्यात कधीच प्रियंका सोबत काम करायचे नाही असेही सांगितले.

 

अक्षय कुमारचे भूतकाळात बरेच अफेअर होते. मात्र लग्न ट्विंकल खन्नासोबत केले. लग्नानंतरही म्हणे तो प्रियंका चोप्राच्या प्रेमात पडला होता. रिपोर्ट्सनुसार, प्रियंका आणि अक्षयच्या नात्याबद्दल ट्विंकल खन्नाला हिंट लागल्यानंतर तिच्यासोबत पुन्हा काम करायचे नाही अशी चेतावणी दिली. आता अक्षय त्याच्या लग्नाच्या बाबतीत खूप प्रामाणिक मानला जातो.

टॅग्स :अमिताभ बच्चनराज बब्बरजया बच्चनस्मिता पाटीलअक्षय कुमारप्रियंका चोप्रा