Join us  

'लोकांना कसं काय कळतं?'; लग्नाच्या चर्चांवर अर्जुन कपूरने सोडलं मौन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 6:03 PM

Arjun kapoor:येत्या काही दिवसात लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, या चर्चांवर आता अर्जुनने मौन सोडलं आहे. 

सध्या बॉलिवूडमध्ये लग्नसराईचे वारे वाहत आहेत. त्यामुळे आतापर्यंत अनेक लोकप्रिय कलाकारांनी लग्नगाठ बांधून त्यांच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात केली आहे. यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अभिनेता अर्जुन कपूर ( arjun kapoor) आणि मलायका अरोरा (malaika arora) यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. ही जोडी येत्या काही दिवसात लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, या चर्चांवर आता अर्जुनने मौन सोडलं आहे. गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत असलेले मलायका आणि अर्जुन येत्या डिसेंबर २०२२ मध्ये लग्नगाठ बांधणार असल्याचं म्हटलं जात आहे. इतकंच नाही तर हे दोघं कोर्ट मॅरेज करणार असल्याचंही म्हटलं जात आहे. त्यामुळेच या चर्चांवर आता अर्जुनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या चर्चांवर भाष्य केलं आहे.

"मला हे ऐकूनच आश्चर्य वाटलं, कारण लोकांना माझ्या आयुष्याविषयी माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे",अशी पोस्ट अर्जुनने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टवरुन त्याने अप्रत्यक्षपणे मलायकासोबतच्या लग्नावर होत असलेल्या चर्चांवर भाष्य केल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान, मलायका आणि अर्जुन हे गेल्या ४ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या मलायका अर्जुनपेक्षा बरीच मोठी असल्यामुळे अनेकदा या दोघांना वयातील अंतरामुळे ट्रोलही केलं. मात्र, प्रत्येक वेळी ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देत त्यांनी गप्प केलं. सध्या अर्जुन त्याच्या अपकमिंग द लेडी किलर या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटात तो भूमी पेडणेकरसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

टॅग्स :अर्जुन कपूरमलायका अरोराबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा