Join us  

‘धाकड’च्या अपयशानंतर कंगनाने ‘भूल भुलैय्या २’ साठी लिहिली स्पेशल पोस्ट; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 3:32 PM

Kangana ranaut: 'मणिकर्णिका'सारखा सुपहिट चित्रपट दिल्यानंतर कंगनाचा 'धाकड' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला.

आपल्या दमदार अभिनयशैली आणि स्पष्टवक्तेपणामुळे कायम चर्चेत येणारी अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत. 'मणिकर्णिका'सारखा सुपहिट चित्रपट दिल्यानंतर कंगनाचा 'धाकड' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्याची सोशल मीडियावर कमालीची चर्चा रंगली होती. मात्र, हा चित्रपट फारसा प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला नाही. त्याच्या तुलनेत कार्तिक आर्यनची मुख्य भूमिका असलेला ‘भूल भुलैय्या २’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. त्यामुळे कंगनाने या चित्रपटासाठी एक पोस्ट शेअर केली आहे.

'धाकड' प्रदर्शित होण्यापूर्वी कंगनाने या चित्रपटाचं जोरदार प्रदर्शन केलं होतं. मात्र, प्रत्यक्षात हा चित्रपट पडद्यावर आल्यानंतर तो अपयशी ठरला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी कशीबशी कमाई केली. तर, ‘भूल भुलैय्या २’ ची गाडी पहिल्या दिवसापासून सुसाट सुरु आहे. त्यामुळे कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे.

आपल्या चित्रपटाच्या पदरात जरी अपयश पडलं असलं तरीदेखील कंगनाने कार्तिक आर्यनचं कौतुक करण्यास जराही कसर सोडलेली नाही. तिने मोठ्या मनाने या चित्रपटाच्या टीमचं आणि कलाकारांचं अभिनंदन केलं आहे.

‘भूल भुलैय्या २’ चित्रपटाचं आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे खूप अभिनंदन,” असं कॅप्शन देत कंगनाने एक पोस्ट शेअर केली आहे. 

दरम्यान, कार्तिकच्या ‘भूल भुलैय्या २’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी १४ कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली असून सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुसाट कमाई करत आहे. या चित्रपटात कार्तिकसह अभिनेत्री कियारा आडवाणीने स्क्रीन शेअर केली आहे.

टॅग्स :कंगना राणौतबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा