तर ऋचाला विचारण्यात आले की, जेव्हा तिला खूप भूख लागते आणि रागही येतो तेव्हा तिला कोणत्या तीन गोष्टी हव्या असतात? यावर ऋचा उत्तर देते की, ‘त्यावेळी मला फ्रूट्स, दाळ आणि भात हवा असतो.’ दरम्यान, कल्की आणि ऋचाचा हा अतिशय हटके असा चित्रपट आहे. यास तुम्ही रोड मुव्ही असेही म्हणू शकता. मात्र यामध्ये रस्त्यावर जेवढी यात्रा दाखविण्यात आली आहे, त्यापेक्षा अधिक आतमध्ये दाखविण्यात आली आहे. चित्रपटात दाखविण्यात आले की, लोक कधीना कधी बदलतात अन् एकत्र चालायला लागतात.
चित्रपटात ऋचा आणि कल्की दोघींचेही नाव जिया आहे. मात्र या दोन्ही जिया एकमेकींच्या तुलनेत अगदी वेगळ्या आहेत. एक जिया जीवन आणि स्वत:विषयी हताश आहे. मात्र अशातही ती चेहºयावर हसू ठेवण्याचे नाटक करते, तर दुसरी जिया खूपच अल्लड आहे. तिला आयुष्य जगायचे असते. दरम्यान, कल्कीच्या या तरुणांविषयीच्या आवडी सध्या चर्चेचा विषय ठरत असून, सोशल मीडिंयावर याविषयीची चांगलीच चर्चा रंगत आहे.