Join us  

‘टिप टिप बरसा पानी’मुळे संतापले जावेद अख्तर, हे आहे कारण!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 2:34 PM

‘टिप टिप बरसा पानी’ या गाण्यावरून अक्षय सध्या ट्रोल होतोय. भरीस भर म्हणजे, गीतकार व लेखक जावेद अख्तरही या गाण्यामुळे संतापले आहेत.

ठळक मुद्दे ‘सूर्यवंशी’त हे गाणे रिक्रिएट केले जाणार असे अक्षयने जाहिर करताच, अनेक लोकांनी सोशल मीडियावर अक्षयला सुनावले.

अक्षय कुमारचासूर्यवंशी’ हा आगामी सिनेमा सध्या यातील एका गाण्यामुळे चर्चेत  आहे. होय, या सिनेमात अक्षय व रवीना टंडनचे ‘टिप टिप बरसा पानी’ हे आयकॉनिक सॉन्ग रिक्रिएट केले जाणार आहे. ‘मोहरा’ चित्रपटातील ‘टिप टिप बरसा पानी’ या गाण्याने तब्बल दोन दशकांहून अधिक काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. आजही हे गाणे सुपरहिट आहे. अक्षय आणि रवीनाचे हे गाणे पुन्हा एकदा  रिक्रिएट केले जाणार म्हटल्यावर खरे तर चाहत्यांना आनंद व्हायला हवा. पण सध्या तरी अक्षयचे चाहते फार खूश नाहीत. या गाण्यावरून अक्षय सध्या ट्रोल होतोय. भरीस भर म्हणजे, गीतकार व लेखक जावेद अख्तरही या गाण्यामुळे संतापले आहेत.

जुन्या गाण्यांच्या कॉपी राईटबद्दल जावेद अख्तर अनेकदा आवाज उठवताना दिसतात. जुन्या गाण्यांना नव्याने फोडणी देऊन ते चित्रपटांत वापरण्यावर त्यांचा आक्षेप आहे. त्यामुळेच ‘टिप टिप बरसा पानी’ हे गाणे ‘सूर्यवंशी’मध्ये रिक्रिएट होणार हे ऐकताच ते संतापले. हा प्रकार कुठेतरी थांबावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ‘डेक्कन क्रॉनिकल’ला दिलेल्या मुलाखतीत ते यावर बोलले. जुन्या गाण्यांना रिक्रिएट करण्याचा प्रकार थांबायला हवा. मी याआधीही अनेकदा याबद्दल कायदेशीर नोटीस पाठवले आहे. आज विरोध करायला आनंद बक्षी (टिप टिप बरसा पानी,हे गाणे आनंद बक्षी यांनी लिहिले) आपल्यात नाहीत, असे जावेद अख्तर यावेळी म्हणाले.

तसेही ‘टिप टिप बरसा पानी’ या गाण्याला विरोध करणारे जावेद अख्तर एकटे नाहीत. सोशल मीडियावरही यावरून अक्षय ट्रोल होतोय. ‘सूर्यवंशी’त हे गाणे रिक्रिएट केले जाणार असे अक्षयने जाहिर करताच, अनेक लोकांनी सोशल मीडियावर अक्षयला सुनावले.अक्षय कुमार रवीना टंडनला इग्नोर करून स्वत: या गाण्याचे श्रेय घेत असल्याचा चाहत्यांचा आरोप आहे.   

टॅग्स :जावेद अख्तरअक्षय कुमाररवीना टंडनसूर्यवंशी