सलमान खानच्या ‘भारत’मधून प्रियांका चोप्राने एक्झिट घेतल्यानंतर अनेक अभिनेत्री या चित्रपटात एन्ट्री मिळण्याच्या प्लानिंगमध्ये होत्या. पण हा चित्रपट कॅटरिना कैफच्या झोळीत पडला. ‘भारत’मधील कॅटरिनाच्या एन्ट्रीने सलमान खान आणि चाहते दोन्हीही जाम खूश आहेत. पण एक व्यक्ति मात्र यामुळे चांगलीच दुखावलीयं. ही व्यक्ती कोण तर सलमानची ‘रेस3’ची हिरोईन. होय, जॅकलिन फर्नांडिस़ सलमानवर जॅक नाराज असल्याच्या बातम्या त्यामुळे येत आहेत.
या चित्रपटात सलमानसोबत अभिनेत्री कतरिना कैफ दिसणार आहे. तसेच दिशा पटानी, तब्बू, नोरा फतेही हे कलाकारही प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. २०१४ साली प्रद्रशित झालेला दक्षिण कोरियाई चित्रपट 'ओड टू माई फादर'मधून प्रेरणा घेऊन भारत हा चित्रपट बनवण्यात आला आहे. या चित्रपटात जॅकी श्रॉफ सलमानच्या पित्याच्या भूमिकेत आहे. यापूर्वी सलमान व जॅकी ‘वीर’मध्ये एकत्र दिसले होते. 'भारत' चित्रपटाची कथा १९४७ म्हणजे, भारत-पाक फाळणीच्या काळापासून सुरु होईल. भारत नावाच्या एका सामान्य व्यक्तिची कथा यात दिसेल. मी परतलो नाही तर तू कुटुंबाचा सांभाळ करशील, असे भारतचे वडिल फाळणीच्या काळात स्थलांतर करताना भारतला सांगतात. या कथेत भारतचा ५० वर्षांचा प्रवास दाखवला जाणार असल्याने प्रत्येक दहा वर्षांच्या अंतराने सलमानचे लूक बदलताना दिसेल. हा सिनेमा २०१९ला ईदमध्ये प्रदर्शित होणार आहे.