‘हम पाँच’ गँगसोबत विदयाने दिला जुन्या आठवणींना उजाळा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2016 13:18 IST
१९९०ची कॉमेडी टीव्ही मालिका ‘हम पाँच’ आठवतेय ना? पाच बहिणींची लाईफस्टाईल, भाषा, विचारसरणी कॉमिक पद्धतीने मालिकेतून प्रेक्षकांना निखळ आनंद ...
‘हम पाँच’ गँगसोबत विदयाने दिला जुन्या आठवणींना उजाळा!
१९९०ची कॉमेडी टीव्ही मालिका ‘हम पाँच’ आठवतेय ना? पाच बहिणींची लाईफस्टाईल, भाषा, विचारसरणी कॉमिक पद्धतीने मालिकेतून प्रेक्षकांना निखळ आनंद मिळवून द्यायची, हे आपण कसे विसरू शकतो ? अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या मालिकेने बॉलिवूडला एक गुणी कलाकार मिळवून दिली. ती म्हणजे विदया बालन. तिने आनंद माथूर यांची मुलगी राधिका माथूर या तरूणीची व्यक्तीरेखा मालिकेत साकारली आहे. या राधिकाला प्रेक्षकांनी विशेष पसंत केले अन् आजही तिच्यामुळे ही मालिका पाहण्यास प्रेक्षक उद्युक्त होतो. तुम्हाला जर असं कळालं की, ‘हम पाँच’ ची चुलबुली गँग पुन्हा एकत्र आली तर? होय, तब्बल वीस वर्षांनंतर या गँगला विदया कार्यक्रमादरम्यान भेटली. एवढ्या वर्षांनंतर सर्वजणी एकत्र आल्यावर आणखी काय होणार? गँगसोबत बऱ्याच दिवसांनी विदयालाही धम्माल, मजा, मस्ती करता आली. शोभा आनंद (पाचही मुलींची आई), भैरवी रायचुरा (काजल भाई) आणि वंदना पाठक (मीनाक्षी). या कलाकारांसोबत तिने पुन्हा एकदा ‘हम पाँच’मधील जुन्या दिवसांना उजाळा दिला. ‘कहानी २’ चित्रपटासाठी ती सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट एक थ्रिलरपट असून ‘कहानी’चा हा सिक्वेल आहे. सिक्वेल असला तरीही याचे कथानक पूर्णपणे वेगळे आहे. ‘हम पाँच’ टीमसोबत विद्या बालन.