अपयशाची भिती वाटते - आथिया शेट्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2016 20:41 IST
सुनील शेट्टीची मुलगी आथियाचा जेमतेम एकच चित्रपट आला आहे, मात्र आतापासूनच तिला अपयश मिळण्याची भिती वाटतेय. ती म्हणते, कलावंतांच्या ...
अपयशाची भिती वाटते - आथिया शेट्टी
सुनील शेट्टीची मुलगी आथियाचा जेमतेम एकच चित्रपट आला आहे, मात्र आतापासूनच तिला अपयश मिळण्याची भिती वाटतेय. ती म्हणते, कलावंतांच्या जीवनात चढ-उतार येतच असतात. यश असो की अपयश असो दोन्ही आपल्याला काहीतरी शिकवून जातात. आथियाने सलमान खान निर्मित ‘हिरो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पन केले होते. तिचा पहिला चित्रपट बॉक्स आॅफिसवर मोठा गल्ला जमावू शकला नसला तरी तो फ्लॉप झाला नाही. आपल्या पहिल्या चित्रपटातून अपेक्षेनुरूप यश मिळू न शकल्याचे शल्य तिच्या मनात असू शकते. आथिया म्हणाली, मला अपयशाची भिती वाटत नाही असे जर मी म्हणेल तर कदाचित मी स्वत:ची समजूत काढणारे विधान ठरले. माझे वडील (सुनील शेट्टी) नेहमीच मला सांगत असतात, मला ठाऊक आहे तू यशाला चांगल्या प्रकारे सांभळणार आहेस. पण तू अपयशाचा सामना कसा करशील? अपयशाचा सामना करताना आपला मान कमी होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. विन्रम असावे लागते. असेही मला सांगण्यात आले. कलाकाराच्या जीवनात चढ-उतार येत असतात, असेही ती म्हणाली. स्टारपुत्रांना देखील बॉलिवूडमध्ये संघर्ष करावा लागतो का? या प्रश्नाच्या उत्तरात आथिया म्हणाली, स्टारपपुत्र असल्याने सर्व प्रकारच्या लोकांना विशेषत: बॉलिवूडमधील दिग्गजांना भेटण्याची संधी मिळते. मात्र एकादा तुम्ही चित्रपटांच्या दुनियेत आल्यावर कामानेच आपली ओळख निर्माण करावी लागते.आथिया सध्या अनिस बज्मीच्या ‘मुबारकां’ या चित्रपटात काम करीत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अनिल कपूर, अर्जुन कपूर व इलियाना डिक्रुझ व अमृता सिंग यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. याचित्रपटाच्या शूटिंग दरम्यान तिचे नाव अर्जुन कपूरशी जोडण्यात येत आहे. मात्र या बातम्या तिने अफवा असल्याचे सांगितले.