Join us

​‘मनमर्झियां’च्या दिग्दर्शकाची हाकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2016 11:13 IST

आयुषमान खुराणा आणि भूमी पेडणेकर यांच्या आगामी ‘मनमर्झियां’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाची निर्मात्याने हाकालपट्टी केली आहे.निर्माते आनंद एल राय यांच्याशी ...

आयुषमान खुराणा आणि भूमी पेडणेकर यांच्या आगामी ‘मनमर्झियां’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाची निर्मात्याने हाकालपट्टी केली आहे. निर्माते आनंद एल राय यांच्याशी होत असलेल्या मतभेदामुळे दिग्दर्शक समीर शर्मा यांना हा चित्रपट सोडावा लागला आहे.त्यांच्या जागी आता ‘नील बटे सन्नाटा’ फेम दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारी ‘मनमर्झियां’ची सुत्रे हाती घेणार आहेत.अश्विनी सध्या पंजाबला लोकशन्सची पाहणी करण्यासाठी गेल्या असून यापूर्वी चित्रित झालेले सर्व सीन्स पुन्हा शुट करण्यात येणार आहेत.ती म्हणाली की, ‘लेखिका कनिकाने फार छान कथा लिहिली आहे. त्यामध्ये मी फार बदल करणार नाही. पण माझा दृष्टीकोन मी त्यात जोडणार आहे. लवकर आयुषमान आणि भूमीसोबत अ‍ॅक्टिंग वर्कशॉप घेऊन त्यांना कॅरेक्टर समजून सांगण्यात येणार आहे.मात्र त्यांनी समीर व निर्माते यांमध्ये का वाद झाला याबद्दल बोलण्यास नकार दिला. ‘दम लगा के हायशा’नंतर आयुषमान-भूमिची जोडी पुन्हा एकदा या रॉमॅण्टिक कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे.