शाहीद मल्ल्याचा सुमधुर आवाज हा अमित त्रिवेदीनी जो मूड संगीतबद्ध केला आहे त्याला अगदी साजेसा असा आहे. 'मनमर्जियां'मधील 'दरिया...' हे गाणे शाहीद मल्ल्या आणि अम्मी विर्क यांनी गायले असून अर्थपूर्ण बोल त्याला लाभले आहेत. त्यामुळे हे गाणे ज्यांना रोमँटिक गाणी आवडतात अशा प्रत्येक रसिकाच्या संग्रहामध्ये आपले स्थान मिळवेल. हे गाणे रुमी(तापसी पन्नू), रॉबी (अभिषेक बच्चन) आणि विकी (विकी कौशल) यांच्या नातेसंबंधामधील गुंतागुंत अधोरेखित करते. या गाण्यातून प्रेमाचा त्रिकोण समोर येतो. अनुराग कश्यप यांचे दिग्दर्शन असलेल्या चित्रपटातील ही कथा आहे.
हिंदीतील गाणी ही पाश्चिमात्य चित्रपटांमधील गाणी आणि नृत्याच्या संस्कृतीतून आलेली असतात. आगामी 'मनमर्जियां' चित्रपटातील या गाण्यासाठी शाहीद मल्ल्याला खूप वाहवा मिळाली आहे. या गाण्याला केवळ दोनेक दिवसांत ३० लाखांहूनही अधिक हिट मिळाल्या असून हा एक दमदार पंजाबी प्रेमपोवाडा असल्याची पोचपावती त्याला मिळाली आहे.