Birthday Special: दिलीप कुमारांबद्दल जाणून घ्या काही माहित नसलेल्या गोष्टी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2016 08:36 IST
दिलीप कुमार यांचा आज(11डिसेंबर) वाढदिवस. प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिलीप कुमार यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याने ...
Birthday Special: दिलीप कुमारांबद्दल जाणून घ्या काही माहित नसलेल्या गोष्टी...
दिलीप कुमार यांचा आज(11डिसेंबर) वाढदिवस. प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिलीप कुमार यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याने त्यांच्या तमाम चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे. आपल्या सिने कारकिर्दीत दिलीप कुमार यांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिलेत़. सन १९४४ मध्ये ‘ज्वारभाटा’ या चित्रपटाद्वारे त्यांनी बॉलिवूड डेब्यू केले होते़. या ‘ट्रॅजेडी किंग’च्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर त्यांच्याबद्दलच्या काही गोष्टी़... दिलीप कुमार यांचे खरे नाव युसूफ खान आहे़चंदेरी दुनियेत युसूफ खानचे दिलीप कुमार झाले तेव्हा त्यांच्या वेगवेगळ्या नावांवर विचार झाला होता़ उदयकुमार आणि वामन कुमार या नावावरही विचार झाला़ मात्र अनेक विचारांती दिलीप कुमार हे नाव ठरले़. दिलीप कुमार बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार आहेत, जे मूळचे पाकिस्तानी वंशाचे आहेत़. चित्रपटात येण्यापूर्वी दिलीप कुमार पुण्यात फळ विकायचे़ बॉम्बे टॉकीजचे संस्थापक हिमांशू राय यांच्या पत्नी व अभिनेत्री देविकाराणी यांच्या प्रोत्साहनानेच १९४३ मध्ये युसूफ खान याचा हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. हिंदी लेखक भगवतीचरण वर्मा यांनी युसूफ खान याचे दिलीपकुमार असे नामकरण केले. बॉम्बे टॉकीजचे संस्थापक हिमांशू राय यांच्या पत्नी व अभिनेत्री देविकाराणी यांच्या प्रोत्साहनानेच १९४३ मध्ये युसूफ खान याचा हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. हिंदी लेखक भगवतीचरण वर्मा यांनी युसूफ खान याचे दिलीपकुमार असे नामकरण केले. मधुबाला आणि दिलीप कुमार यांच्या प्रेमाबद्दल सर्वांनाच ठाऊक आहे. दिलीप कुमार यांचे मधुबालावर जीवापाड प्रेम होते. कामिनी कौशल यांच्यानंतर दिलीप साहेबांनी मधुबालाला आपल्या जोडिदाराच्या रुपात बघितले होते. मधुबालाबरोबरसुद्धा दिलीप साहेबांनी एकुण चार सिनेमांमध्ये एकत्र काम केले. तराना, संगदिल, अमर आणि मुगल-ए-आजम या सिनेमांमध्ये दिलीप कुमार-मधुबाला ही जोडी झळकली होती. दोघांचे प्रेम बहरत असताना मधुबालाच्या वडिलांनी त्यांच्यात आडकाठी निर्माण केली. मधुबालाचे वडील अताउल्लाह खान यांना या दोघांचे नाते कबूल नव्हते. त्यामुळेच त्यांनी मधुबालाला दिलीप कुमार यांच्याबरोबर 'नया दौर' या सिनेमात काम करु दिले नाही. सिनेमा साईन करुन काम करण्यास नकार दिल्यामुळे निमार्ता-दिग्दर्शक बी.आर.चोप्रा यांनी मधुबालावर खटला दाखल केला. हे प्रकरण न्यायालयात गेले. दिलीप साहेबांनी मधुबालाऐवजी बी.आर.चोप्रा यांना साथ दिली. त्यामुळे मधुबाला आणि दिलीप कुमार यांचे नाते संपुष्टात आले. लिविंग लेजेंड दिलीप कुमार यांनी त्यांच्यापेक्षा वयाने तब्बल बावीस वर्षे लहान असलेल्या सायरा बानोबरोबर लग्न केले. लग्नाच्या वेळी सायरा बानो २२ वर्षांच्या तर दिलीप साहेब २२ वर्षांचे होते. ही जोडी बॉलिवूडमधील यशस्वी जोडी म्हणून आजही ओळखली जाते.गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री सायरा बानो वयाच्या आठव्या वर्षीच ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांच्या प्रेमात पडल्या होत्या. १९५२ मध्ये दिग्दर्शक महबूब खान यांच्या सिनेमात दिलीप कुमार आणि निम्मी प्रमुख भूमिकेत होते. हा सिनेमा बघून सायरा बानो दिलीप साहेबांच्या प्रेमात पडल्या. तेव्हाच त्यांनी दिलीप साहेबांसह लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. दिलीप कुमार यांच्याबरोबर लग्नगाठीत अडकण्यापूर्वी सायरा बानो आणि राजेंद्र कुमार यांचा रोमान्स सुरु होता. मात्र त्यावेळी राजेंद्र कुमार विवाहित होते आणि त्यांना मुलेही होती. सायरा-राजेंद्र यांच्या नात्याबद्दल राजेंद्र कुमार यांची पत्नी आणि सायरा बानोची आई नसीम बानो यांना समजले होते. त्यामुळे नसीम बानो यांनी त्यांच्या परिचयाचे असलेल्या दिलीप साहेबांसमोर सायरा बानोबरोबर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. नसीम बानो यांचा प्रस्ताव दिलीप साहेबांनी स्वीकारला. सायरा बानो आणि दिलीप कुमार लग्नानंतर गोपी , बैराग आणि दुनिया या सुपरहिट सिनेमांमध्ये एकत्र झळकले आहेत.१९८० मध्ये अपत्यप्राप्तीच्या इच्छेसाठी दिलीप कुमार यांनी आस्मा या घटस्फोटित महिलेशी विवाह केला. पण दोन वर्षांनंतर तिला ‘तलाक’ दिला. सर्वाधिक पुरस्कार आपल्या नावी करणा-या दिलीप साहेबांच्या नावाची नोंद गिनीज बुक आॅफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवले गेले आहे. आपल्या जीवनात दिलीप साहेबांनी तब्बल आठ वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्म फेअर पुरस्कार मिळवला होता. हा कितीर्मान अद्याप कुणीही मोडू शकलेला नाहीये. . दाग, अंदाज, देवदास, नया दौर, कोहिनूर, लीडर, राम और श्याम, शक्ती या चित्रपटांसाठी त्यांना आठ फिल्म फेअर पुरस्काराने गौरविण्यात आले. सलग चार फिल्म फेअर जिंकणारे बॉलिवूडचे ते पहिले अभिनेते ठरले.