Join us
Daily Top 2Weekly Top 5

​अरिजीत म्हणतो, मी वारंवार सलमानची माफी मागणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2016 16:36 IST

अभिनेता सलमान खान आणि गायक अरिजीत सिंह यांच्यातील वाद आता तसा जुना झाला आहे. याच वादातून सलमानने ‘सुलतान’मधील अरिजीतने ...

अभिनेता सलमान खान आणि गायक अरिजीत सिंह यांच्यातील वाद आता तसा जुना झाला आहे. याच वादातून सलमानने ‘सुलतान’मधील अरिजीतने गायलेले एक गाणे काढून टाकले होते.  अरिजीतने सोशल मीडियावरून सलमानची जाहिर माफी मागितली, तेव्हा कुठे हा वाद चव्हाट्यावर आला होता. या वादाबद्दल अरिजीतने फेसबुक पोस्टद्वारे सलमानची माफी मागितली होती. तसेच ‘सुलतान’मधील त्याने गायलेले ‘जग घूमेया..’ हे गाणे न गाळण्याची विनंती केली होती. (नंतर हे गाणे राहत फतेह अली खान यांनी गायले.)अर्थात काही वेळानंतर माफीची ही पोस्ट अरिजीतने काढूनही टाकली होती. अलीकडे एका मुलाखतीदरम्यान अरिजीतला या संपूर्ण वादावर प्रश्न विचारला गेला. यावर हे प्रकरण माझ्यासाठी संपलेले आहे, असे अरिजीतने अगदी स्पष्ट शब्दांत बजावले. काही घडले आणि सलमान माझ्यावर नाराज झाला. यानंतर मी त्याची माफीही मागितली. पण यामुळेही त्याची नाराजी दूर झाली नाही. आता म्हणून मी वारंवार माफी मागत राहू, असे होऊ शकत नाही. सलमानचा अनादर करण्याचा माझा उद्देश नव्हता आणि नाही. मी एकदा माफी मागितलेली आहे आणि त्यामुळेच माझ्या लेखी हे प्रकरण संपलेले आहे, असे तो म्हणाला.