Join us

​आमिर खानच्या पाणी फाउंडेशनचे सत्यमेव जयते वॉटर कप २

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2016 17:09 IST

सत्यमेव जयते वॉटर कपच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्राच्या तीन तालुकयाांमध्ये एकुण मिळून वार्षिक १,३६८ कोटी लिटर  इतका पाणीसाठा करण्याची क्षमता ...

सत्यमेव जयते वॉटर कपच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्राच्या तीन तालुकयाांमध्ये एकुण मिळून वार्षिक १,३६८ कोटी लिटर  इतका पाणीसाठा करण्याची क्षमता निर्माण  झाली. या घवघवीत यशातून प्रेरणा घेऊन महाराष्ट्राच्या ३० तालुकयाांमध्ये पाणी फाउंडेशन घोषित करत आहे, सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २. सत्यमेव जयते वॉटर कप २ मध्ये सहभागी घेण्यास पात्र असलेल्या ३० तालुक्यांच्या नावाची घोषणा ३ जानेवारी २०१७ रोजी सायांकाळी ४:३० वाजता मुंबई  येथील सह्याद्री स्टेट गेस्ट हाऊस येथे होणाºया पत्रकार परीषदेत करण्यात येईल. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री म. श्री , देवेंद्र फडणवीस, पाणी फाउंडेशन चे संस्थापक  आमीर खान आणि किरण राव, पाणी फाउंडेशनचे सी.ई.ओ.  सत्यजीत भटकळ आणि सिनेमा  क्षेत्रातले अनेक मान्यवर या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहे . वॉटर कपसाठी खास तयार केलेल्या म्युझिक व्हीडीअ‍ोचे या प्रसंगी अनावरण करण्यात येणार आहे .  स्पर्धेविषयी थोडक्यात :सत्यमेव जयते वॉटर कप म्हणजे स्पर्धेच्या काळात जलसंवर्धन आणि पाणलोट व्यवस्थापनाची  उत्तम कामगिरी करण्यासाठी वेगवेगळ्या गावामध्ये लावलेली चुरस होय . वॉटर कप स्पर्धेच्या  दुसºया  सत्राचा कालावधी  ८ एप्रिल २०१७ ते २२ मे २०१७ असा आहे  स्पधेर्चे विजेते म्हणून घोषित  केल्या जाणाºया तीन गावाांना रोख बक्षिसे दिली जातील. पहिल बक्षीस आहे रू. ५० लाख, दुसरे  बक्षीस आहे  रू. ३० लाख आणि तिसर बक्षीस आहे रू. २० लाख. याव्यतिरिक्त  प्रत्येक तालुक्यातील सवोत्तम कामगीरी करणाºया गावाला १० लाख रुपयाांचे रोख बक्षीस दिले जाईल. निवडलेल्या  तालुक्यांतील  प्रत्येक गाव आपल्या ग्रामपचांयातीमार्फत या स्पर्धेत भाग घेऊ शकते. म्हणून सहभागाचा निर्णय गावात स्वत: घ्यायचा आहे .