बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) त्याच्या चित्रपटांमध्ये जितक्या प्रामाणिकपणाने आणि तत्त्वांनी काम करतो तितक्याच प्रामाणिकपणे आणि तत्त्वांनी तो त्याचे वैयक्तिक आयुष्य जगतो. चित्रपटसृष्टीला काही सर्वोत्तम चित्रपट देणाऱ्या 'मिस्टर परफेक्शनिस्ट'ची कारकीर्द मोठी आहे, परंतु त्याने कधीही त्याच्या मूल्यांशी तडजोड केली नाही. अशीच एक घटना म्हणजे त्याने अंडरवर्ल्डकडून आलेले निमंत्रण धाडसाने नाकारले. या गोष्टीने त्याच्या कुटुंबाला काळजी वाटली होती.
ही ९०च्या दशकातील गोष्ट आहे, जेव्हा मुंबईत अंडरवर्ल्डचा खूप प्रभाव होता आणि अनेक बॉलिवूड स्टार त्यांच्या पार्ट्यांमध्ये सहभागी व्हायचे. एकदा आमिर खानला दुबईमध्ये आयोजित केलेल्या अंडरवर्ल्ड पार्टीमध्ये सहभागी होण्याचे आमंत्रणही मिळाले होते. त्यावेळी, असे आमंत्रण नाकारणे सोपे नव्हते, कारण त्यामुळे अंडरवर्ल्डशी शत्रुत्व निर्माण होऊ शकते. अनेक कलाकार भीतीपोटी किंवा स्वतःच्या फायद्यासाठी या पार्ट्यांमध्ये सहभागी होत असत, परंतु आमिर खान त्यापैकी नव्हता.
आमिर खानने नाकारली अंडरवर्ल्डची ऑफरअलीकडेच आमिर खानने एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितले. तो म्हणाला, "मी मध्य पूर्व दुबईतील त्यांच्या पार्टीला उपस्थित राहण्याचे आमंत्रण नाकारले. अंडरवर्ल्डमधील काही लोक मला पार्टीला आमंत्रित करण्यासाठी माझ्याकडे आले. त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यांनी मला पैसे आणि माझ्या आवडीचे कोणतेही काम देऊ केले. तरीही मी येण्यास नकार दिला. त्यांनी लगेच त्यांचा सूर बदलला आणि म्हणाले की मला आता यावे लागेल कारण माझी उपस्थिती आधीच जाहीर झाली आहे आणि ती प्रतिष्ठेची बाब आहे."
अंडरवर्ल्डला हे स्पष्टपणे सांगितलेसितारे जमीन पर अभिनेता पुढे म्हणाला, "ती आमची शेवटची भेट होती. मी म्हणालो, ''तुम्ही एका महिन्यापासून भेटत आहात आणि मी तुम्हाला सुरुवातीपासूनच सांगत होतो की मी येणार नाही. तुम्ही खूप डेंजरस आहात. म्हणून तुम्ही मला मारहाण करू शकता, माझ्या डोक्यावर मारू शकता, माझे हातपाय बांधू शकता आणि जबरदस्तीने मला कुठेही घेऊन जाऊ शकता, पण मी स्वतः येणार नाही. म्हणून त्यांनी त्यानंतर माझ्याशी संपर्क साधणे बंद केले."
कुटुंब होते काळजीतया निर्णयामुळे आमिर खानचे कुटुंबही काळजीत होते. तो अभिनेता म्हणाला, "त्यावेळी माझी दोन लहान मुले होती. माझे पालक खूप काळजीत होते. ते म्हणाले, 'तू काय करताय? ते खूप धोकादायक आहेत.' तेव्हा मी त्यांना फक्त एकच गोष्ट सांगितली, 'मला माझे आयुष्य माझ्या मनाप्रमाणे जगायचे आहे. मला तिथे जायचे नाही.' मला माझ्या जवळच्या लोकांची जास्त काळजी वाटत होती."