बुलडाणा : ज्या खात्यामध्ये दोन वर्षांमध्ये कोणताही आर्थिक व्यवहार झाला नाही आणि अशा खात्यामध्ये काहीच रक्कम नसेल, तर ती सर्व खाती बंद करण्याचा निर्णय स्टेट बँकेने घेतला आहे. या आदेशामुळे स्टेट बँकेची राज्यभरातील हजारो खाती आता बंद होणार आहेत.
शासनाच्या सर्व योजनांचे आर्थिक व्यवहार, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन, वृध्द कलावंतांचे मानधन तसेच शासनाच्या सर्व योजनांचे व्यवहार बँकामार्फत सुरू झाल्याने, सर्व लाभधारकांना बँकेत खाते उघडावेच लागते. ज्या बचत खात्यामध्ये दोन वर्षात एकदाही अर्थिक व्यवहार झाला नाही अशी खातीसुद्धा यापुढे बंद होणार आहेत. एकट्या बुलडाणा शहरातील स्टेट बँकेमध्ये झीरो बॅलेंसची ७ हजारापेक्षा जास्त खाती असून, जिल्हाभरात ही संख्या ४० हजारावर आहे. या खातेदारांना कोणतीही पूर्वसुचना न देता त्यांचे बँक खाते बंद करण्यात येणार आहेत.
यासंदर्भातील आदेश प्रापत झाले असून लवकरच कारवाई सुरू होईल. संपूर्ण राज्यातच अशा प्रकारची खाती बंद केली जातील, अशी माहिती स्टेट बँक आॅफ इंडियाच्या बुलडाणा शाखेचे व्यवस्थापक अशोक सोनुने यांनी दिली. (प्रतिनिधिी)
झीरो बॅलेन्स खाती स्टेट बँक बंद करणार!
ज्या खात्यामध्ये दोन वर्षांमध्ये कोणताही आर्थिक व्यवहार झाला नाही आणि अशा खात्यामध्ये काहीच रक्कम नसेल, तर ती सर्व खाती बंद करण्याचा निर्णय स्टेट बँकेने घेतला आहे
By admin | Updated: July 31, 2014 03:24 IST2014-07-31T03:24:15+5:302014-07-31T03:24:15+5:30
ज्या खात्यामध्ये दोन वर्षांमध्ये कोणताही आर्थिक व्यवहार झाला नाही आणि अशा खात्यामध्ये काहीच रक्कम नसेल, तर ती सर्व खाती बंद करण्याचा निर्णय स्टेट बँकेने घेतला आहे
