नवी दिल्ली : भारताचे कांदा उत्पादन २०१५-२०१६ या पीक वर्षात २०३ लाख टन एवढे विक्रमी असेल असा अंदाज आहे. राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन विकास संस्थेने (एनएचआरडीएफ) म्हटले आहे की, देशातील कांदा उत्पादन पीक वर्ष २०१५-२०१६ मध्ये २०३ लाख टन एवढे विक्रमी शक्य आहे. अनुकूल हवामान आणि चांगला भाव यामुळे त्याचे उत्पादन वाढले आहे, असे म्हटले. कमी पावसामुळे कांद्याचे उत्पादन पीक वर्षात (जुलै ते जून) १८९.२ लाख टन झाले होते. उत्पादनाचा या आधीचा विक्रम १.९४ कोटी टन २०१३-२०१४ मधील होता.
एनएचआरडीएफचे संचालक आर.पी. गुप्ता म्हणाले की, खरीप (उन्हाळा) हंगामातील चांगल्या भावामुळे शेतकऱ्यांना रबी (हिवाळा) हंगामात कांदा लागवडीखाली जास्त क्षेत्र आणण्यासाठी प्रोत्साहन दिले. अनुकूल हवामानानेदेखील रबी पिकाला प्रोत्साहित केले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादन चांगले असण्याची आशा आहे. गेल्या वर्षी अवकाळी पाऊस झाला नाही की गारांचा पाऊस.
यावर्षी १२ लाख हेक्टरवर कांदा लागवड झाली तर ११.७३ लाख हेक्टरपेक्षा काहीशी जास्त आहे, असे गुप्ता म्हणाले.
यंदा कांदा उत्पादन विक्रमी होण्याचा अंदाज
भारताचे कांदा उत्पादन २०१५-२०१६ या पीक वर्षात २०३ लाख टन एवढे विक्रमी असेल असा अंदाज आहे. राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन विकास संस्थेने (एनएचआरडीएफ) म्हटले
By admin | Updated: April 18, 2016 02:13 IST2016-04-18T02:13:10+5:302016-04-18T02:13:10+5:30
भारताचे कांदा उत्पादन २०१५-२०१६ या पीक वर्षात २०३ लाख टन एवढे विक्रमी असेल असा अंदाज आहे. राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन विकास संस्थेने (एनएचआरडीएफ) म्हटले
