नवी दिल्ली : आर्थिक स्थैर्यासाठी कर सुधारणा व त्वरित निर्णय यांची गरज असल्याचे संकेत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बजेटपूर्व भाषणात दिले आहेत. सीमाशुल्क अधिकाऱ्यांच्या (सीबीईसी) बैठकीत ते बोलत होते. आयकरदात्यांशी नम्रपणे वागा; पण कर चुकविणाऱ्यांशी मात्र कडक धोरणाचा अवलंब करा, असे जेटली यांनी या अधिकाऱ्यांना सांगितले.
ज्यांना आयकर भरावा लागणार आहे, त्यांनी तो भरलाच पाहिजे, कर चुकवणाऱ्यांना मोकळे फिरता येणार नाही; पण कर भरणाऱ्यांशी मात्र किमान नम्रतेने वागले पाहिजे, असे जेटली म्हणाले. सीमा शुल्क अधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. सध्या देशात निर्माण झालेल्या संधींचा लाभ घेण्यासाठी आपल्याला तात्काळ निर्णय घेता आले पाहिजेत, तसेच धोरणात सातत्य असले पाहिजे. त्याचबरोबर करप्रणाली आणि प्रशासन यातही सुधारणा होणे गरजेचे आहे, असे जेटली म्हणाले. गुंतवणूकदार व आयकरदाते यांच्यासंदर्भात आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे. आपले कर धोरण गुंतवणूकदार व आयकरदात्यांशी मित्रत्वाचे असले पाहिजेत. जेटली २८ फेब्रुवारी रोजी लोकसभेत २०१५ चा अर्थसंकल्प मांडतील.
कर सुधारणा व त्वरित निर्णयांची गरज -जेटली
आर्थिक स्थैर्यासाठी कर सुधारणा व त्वरित निर्णय यांची गरज असल्याचे संकेत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बजेटपूर्व भाषणात दिले आहेत.
By admin | Updated: January 28, 2015 00:07 IST2015-01-28T00:07:42+5:302015-01-28T00:07:42+5:30
आर्थिक स्थैर्यासाठी कर सुधारणा व त्वरित निर्णय यांची गरज असल्याचे संकेत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बजेटपूर्व भाषणात दिले आहेत.
