नवी दिल्ली : देशात झालेल्या चांगल्या पावसामुळे यंदा कृषी क्षेत्राशी निगडित कंपन्यांवर तेजीची बरसात होणार असून, हे क्षेत्र पुढील तिमाहीत १५ ते ४५ टक्क्यांनी वृद्धी साधेल, असा अहवाल असोचेम या उद्योगांच्या शिखर संघटनेने प्रसिद्ध केला आहे.
या अहवालानुसार, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, रॅलिस इंडिया, जैन इरिगेशनसारख्या मोठ्या आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांचे या तिमाहीतील प्रदर्शन सुधारणार आहे. असोचेमचे अध्यक्ष सुनील कनोरिया म्हणाले की, मान्सूनने भारतीय अर्थव्यवस्थेला नवी पालवी फुटली आहे. अर्थव्यवस्थेला नवी गती मिळाल्यास आता आश्चर्य होणार नाही. कारण चांगल्या पावसामुळे केवळ कृषी क्षेत्रालाच फायदा होणार नाही, तर या क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांनाही फायदा होणार आहे. याचा फायदा अर्थव्यवस्थेलाही होईल. उत्पन्न वाढल्याने ग्रामीण भागातील विविध वस्तू आणि सेवांची मागणी वाढेल. अहवालानुसार महिंद्र अॅण्ड महिंद्रा ट्रॅक्टर्सची विक्री येत्या सात महिन्यांमध्ये १५ टक्क्यांनी वाढण्याची आशा आहे. याशिवाय इतर कंपन्यांकडील ट्रॅक्टर्सची मागणी वाढण्याची
शक्यता आहे. टाटा समूहाची कंपनी असलेल्या रॅलिस इंडियाच्या विक्रीत ३३ टक्के वाढ होण्याची आशा आहे तर कोरोमंडल इंटरनॅशनलने आपल्या व्यवसायात १९ टक्के वाढ होईल, अशी आशा व्यक्त केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>‘मान्सूनचा कृषीसंबंधित कंपन्यांसाठी फायदा’ या अहवालात असोचेमने म्हटले की, सिंचनासंबंधी उपकरण बनविणाऱ्या कंपन्या, कृषी उपकरण बनविणाऱ्या कंपन्या, बियाणांचा विकास करणाऱ्या कंपन्या, अन्नधान्य साठवणाऱ्या कंपन्यांना या तिमाहीत फायदा होण्याची शक्यता अधिक आहे.
कृषी कंपन्यांवर तेजीचा ‘पाऊस’
देशात झालेल्या चांगल्या पावसामुळे यंदा कृषी क्षेत्राशी निगडित कंपन्यांवर तेजीची बरसात होणार
By admin | Updated: September 5, 2016 05:29 IST2016-09-05T05:29:43+5:302016-09-05T05:29:43+5:30
देशात झालेल्या चांगल्या पावसामुळे यंदा कृषी क्षेत्राशी निगडित कंपन्यांवर तेजीची बरसात होणार
