जयशंकर गुप्त, नवी दिल्ली
महाराष्ट्रात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ)च्या निष्क्रिय खात्यांमध्ये सुमारे ५७०० कोटी रुपये जमा आहेत. गेल्या ३६ महिन्यांत या खात्यांमध्ये रक्कम जमा करण्यात आली नाही.
देशात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या निष्क्रिय खात्यांमध्ये २६ हजार ४९६ कोटी रुपये जमा आहेत, अशी माहिती पोलाद, खाण, श्रम आणि रोजगार मंत्री विष्णुदेव साय यांनी लोकसभेत आज दिली.
या खात्याचा कुणीही दावेदार नाही, असे म्हणणे चुकीचे होईल. खात्यांचे दावेदार आहेत; परंतु गेल्या ३६ महिन्यांत या खात्यांत संचालन झाले नाही. अशा खात्यांना कर्मचारी भविष्य निधी योजना, १९५२ चे कलम ७२(६)नुसार ‘निष्क्रिय खाते’ म्हटले जाते, असे साय म्हणाले. यासंदर्भात इंडियन नॅशनल लोकदलचे दुष्यंत चौटाला यांनी प्रश्न विचारला होता.
कर्मचारी भविष्य निधी संघटनेकडे ही रक्कम खातेदारांच्या नावे जमा आहे. अर्ज केल्यानंतर खातेदारांना ती रक्कम दिली जाते. संघटनेकडील निष्क्रिय खात्यांतील रकमेचा इतर कामासाठी वापर केल्या जाऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.
ईपीएफच्या निष्क्रिय खात्यांमध्ये ५७०० कोटी
महाराष्ट्रात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ)च्या निष्क्रिय खात्यांमध्ये सुमारे ५७०० कोटी रुपये जमा आहेत. गेल्या ३६ महिन्यांत या खात्यांमध्ये रक्कम जमा करण्यात आली नाही.
By admin | Updated: July 16, 2014 01:38 IST2014-07-16T01:38:39+5:302014-07-16T01:38:39+5:30
महाराष्ट्रात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ)च्या निष्क्रिय खात्यांमध्ये सुमारे ५७०० कोटी रुपये जमा आहेत. गेल्या ३६ महिन्यांत या खात्यांमध्ये रक्कम जमा करण्यात आली नाही.
