इलकरंजी : शासनाच्या आदेशात इचलकरंजी नगरपालिका हद्दीतील आरक्षणे रद्द करण्याबाबत कळविले असतानाही विरोधक जनतेची दिशाभूल करीत आहेत. जनतेचा कळवळा असल्याचा दावा करणारे विरोधकच जनतेत संभ्रम निर्माण करीत आहेत. केवळ विरोधाला विरोध म्हणून प्रत्येक चांगल्या कामात आडवा पाय मारीत आहेत, असा आरोप नगराध्यक्ष शुभांगी बिरंजे यांनी पत्रकार परिषदेत केला.शहराच्या नव्या विकास आराखड्यात चुकीच्या पद्धतीने आरक्षणे झाल्यामुळे शेतकरी आणि मालमत्ताधारकांत मोठी नाराजी होती. आरक्षणामुळे अनेकांवर अन्याय होणार होता. त्यामुळे शहर विकास योजनेंतर्गत नगररचना विभागाने शहरात टाकलेली सर्व आरक्षणे रद्द केली आहेत; पण विरोधक मात्र त्यामध्येही राजकारण करीत आहेत. याबाबत झालेल्या बैठकीत आजित जाधव आणि मधुकर झोरे यांनी आरक्षणसंदर्भातील दिलेल्या प्रस्तावावर कौन्सिलकडे शिफारस केलेला अहवाल नामंजूर करण्याबाबत सूचित केले होते आणि हीच मंडळी आता आंदोलनाची भाषा करीत आहेत. त्यावेळी कॉँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीच्या नगरसेवकांनी जनतेची बाजू मांडत हा ठराव मंजूर केला होता.शासनाने आरक्षणे रद्द करण्याबाबत ६ सप्टेंबर २०१४ रोजी पालिकेला पत्र दिले आहे. त्यामध्ये कलम ३७ (१) अन्वये पालिकेच्या सर्वसाधारण सभेत फेरबदलाचा उचित प्रस्ताव सादर करून नियमानुसार पुढील कार्यवाही करावी, असे नमूद केलेले आहे; पण विरोधक मात्र आरक्षण रद्द झालेले नाही, असा कांगावा करून जनतेची दिशाभूल करीत आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच या संदर्भात नव्याने प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.यावेळी उपनगराध्यक्ष रणजित जाधव, गटनेते बाळासाहेब कलागते, संजय जाधव, नगरसेविका सौ. बिस्मिल्ला मुजावर, छाया पाटील, तेजश्री भोसले, रेखा रजपुते यांच्यासह जयपाल हेरलगे, राजू गावडे, रहीम मुजावर, पांडुरंग सोलगे, सुशांत कांबळे, आदी उपस्थित होते.
चांगल्या कामात विरोधकांचा आडवा पाय : बिरंजे
इचलकरंजी : शासनाच्या आदेशात इचलकरंजी नगरपालिका हद्दीतील आरक्षणे रद्द करण्याबाबत कळविले असतानाही विरोधक जनतेची दिशाभूल करीत आहेत. जनतेचा कळवळा असल्याचा दावा करणारे विरोधकच जनतेत संभ्रम निर्माण करीत आहेत. केवळ विरोधाला विरोध म्हणून प्रत्येक चांगल्या कामात आडवा पाय मारीत आहेत, असा आरोप नगराध्यक्ष शुभांगी बिरंजे यांनी पत्रकार परिषदेत केला.
By admin | Updated: September 13, 2014 22:59 IST2014-09-13T22:59:36+5:302014-09-13T22:59:36+5:30
इचलकरंजी : शासनाच्या आदेशात इचलकरंजी नगरपालिका हद्दीतील आरक्षणे रद्द करण्याबाबत कळविले असतानाही विरोधक जनतेची दिशाभूल करीत आहेत. जनतेचा कळवळा असल्याचा दावा करणारे विरोधकच जनतेत संभ्रम निर्माण करीत आहेत. केवळ विरोधाला विरोध म्हणून प्रत्येक चांगल्या कामात आडवा पाय मारीत आहेत, असा आरोप नगराध्यक्ष शुभांगी बिरंजे यांनी पत्रकार परिषदेत केला.
