मिलिंदकुमार साळवे, श्रीरामपूर
महाराष्ट्रासह देशातील एकूण २१० साखर कारखान्यांना केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयांतर्गत असलेल्या साखर संचालनालयाने नोटिसा बजावल्या आहेत.
नोटिसा बजावल्यापासून या कारखान्यांनी १५ दिवसात प्रपत्र १ ते ४ मधील आवश्यक ती माहिती केंद्रीय साखर संचालनालयास सादर न केल्यास जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ७ नुसार कारवाई करून या कारखान्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा या संचालनालयाचे उपसंचालक सुधीरकुमार जैस्वाल यांनी कारखान्यांना स्पीड पोस्टाने नोटिसांद्वारे देण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील ७२ कारखान्यांचा समावेश आहे.
सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा इंदापूर, विधानसभाध्यक्ष दिलीप वळसे यांच्या आंबेगावसह अहमदनगर जिल्ह्णातील श्रीरामपूरचा अशोक, राहुरीचा तनपुरे कारखाना, माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचा हिरडगावचा साईकृपा यांचाही यात समावेश आहे.
याशिवाय सन २०१३-१४ च्या हंगामाची आॅनलाईन माहिती प्रपत्रे, विवरणपत्रे मार्च २०१४ पर्यंत न भरल्याने नृसिंह (परभणी), केदारेश्वर (शेवगाव), आजरा (कोल्हापूर), पद्मश्री विठ्ठलराव विखे (केज, बीड), कडा (बीड), अंबाजोगाई (बीड), मराठवाडा (हिंगोली),तुळजाभवानी (तुळजापूर), विश्वास (शिराळा, सांगली), वसंतदादा (सांगली), वसंतराव दादा पाटील (देवळी, नाशिक), के.के.वाघ (निफाड, नाशिक) यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
देशातील २१० साखर कारखान्यांना नोटिसा
महाराष्ट्रासह देशातील एकूण २१० साखर कारखान्यांना केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयांतर्गत असलेल्या साखर संचालनालयाने नोटिसा बजावल्या आहेत.
By admin | Updated: June 12, 2014 00:23 IST2014-06-12T00:23:42+5:302014-06-12T00:23:42+5:30
महाराष्ट्रासह देशातील एकूण २१० साखर कारखान्यांना केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयांतर्गत असलेल्या साखर संचालनालयाने नोटिसा बजावल्या आहेत.
