नवी दिल्ली : नेस्ले इंडियाचे वादग्रस्त ठरलेले मॅगी उत्पादन देशात पाकीटबंद आणि प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांचे स्वरूप बदलण्यास मैलाचा दगड ठरणार, असे दिसते. या वादामुळे खाद्यपदार्थांची पॅकिंग, लेबलिंग व चाचणीचे नियम नव्याने तयार केले जाऊ शकतात. जपानी सल्लागार कंपनी नोमुराने ही माहिती
दिली.
नोमुराचे मनीष जैन व अनुप सुधेंद्रनाथ यांनी एका अहवालात म्हटले आहे की, मॅगीवरून निर्माण झालेला वाद हा आम्हाला पाकीटबंद आणि प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांचे स्वरूप बदलण्यास कारण ठरणारा दिसतो. भारतीय खाद्य सुरक्षा आणि प्रमाणीकरण प्राधिकरणाने संपूर्ण खाद्यपदार्थ क्षेत्रासाठी लेबलिंग, पॅकेजिंग व चाचणीचे नियम अधिक कठोर करणे हे योग्य पाऊल ठरेल व यात ग्राहकाचे हित असेल. नेस्ले इंडिया एक पुनर्गठित उत्पादन आणि पॅकेजिंगच्या माध्यमातून बाजारात पुन्हा पाऊल टाकेल, असा आम्हाला विश्वास आहे. कंपनीचा नवजात पोषण विभाग आणि कॉफी व्यवसायावर काहीही परिणाम होणार नाही, असेही जैन व सुधेंद्रनाथ यांनी सांगितले.
मॅगी वादामुळे खाद्यपदार्थविषयक नियमांत होणार आमूलाग्र बदल
नेस्ले इंडियाचे वादग्रस्त ठरलेले मॅगी उत्पादन देशात पाकीटबंद आणि प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांचे स्वरूप बदलण्यास मैलाचा दगड ठरणार,
By admin | Updated: June 11, 2015 00:07 IST2015-06-11T00:07:10+5:302015-06-11T00:07:10+5:30
नेस्ले इंडियाचे वादग्रस्त ठरलेले मॅगी उत्पादन देशात पाकीटबंद आणि प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांचे स्वरूप बदलण्यास मैलाचा दगड ठरणार,
