नवी दिल्ली : एलईडी बल्ब तयार करणाऱ्या कंपन्या केंद्र सरकारच्या उपक्रमामुळे निर्माण झालेल्या संधी हेरण्यासाठी प्रयत्नशील आहेत. केंद्राने वीज बचतीसाठी एलईडी वापरास चालना देण्याचा उपक्रम सुरूकेला आहे. एलईडी कंपन्यांना २०२० पर्यंत या क्षेत्राची उलाढाल २०,००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
इलेक्ट्रिक लँप अँड कम्पोनन्ट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या मते, सरकारच्या या उपक्रमामुळे या उद्योगाचा आकार पाच वर्षांत ५ पटीने वाढू शकतो. सध्या उद्योगाची उलाढाल ४,००० कोटी रुपयांचा आहे. हॅवेल्स इंडियाचे अध्यक्ष सुनील सिक्का यांनी सांगितले की, ‘एलकोमाच्या व्हिजननुसार, एलईडी बल्बचा बाजार २०२० पर्यंत वाढून २०,००० कोटी रुपयांवर जाईल. पारंपरिक बल्ब, ट्यूब व हॅलोजन लॅम्पच्या जागी एलईडी बल्ब लावण्याच्या सरकारी प्रोत्साहनामुळे उद्योगाला चालना मिळेल.’ सिक्का हे असोसिएशनचे अध्यक्षही आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
एलईडी उद्योगाची होणार चांदी
एलईडी बल्ब तयार करणाऱ्या कंपन्या केंद्र सरकारच्या उपक्रमामुळे निर्माण झालेल्या संधी हेरण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
By admin | Updated: January 12, 2015 01:55 IST2015-01-12T01:55:38+5:302015-01-12T01:55:38+5:30
एलईडी बल्ब तयार करणाऱ्या कंपन्या केंद्र सरकारच्या उपक्रमामुळे निर्माण झालेल्या संधी हेरण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
