संतोष येलकर, अकोला
दुष्काळग्रस्त शेतक-यांना सरकारकडून दिल्या जाणा-या मदतीच्या निकषानुसार अल्प, अत्यल्प भूधारक शेतक-यांना दोन हेक्टर, तर दोन हेक्टरवरील बहुभूधारक शेतकऱ्यांना एक हेक्टर मर्यादेपर्यंतच मदत दिली जात आहे. दुष्काळी परिस्थितीत सर्वच शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना, मदत वाटपातही हेक्टरी मर्यादेच्या नावाखाली दुजाभाव केला जात असून, त्यामध्ये बहुभूधारक शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याची बाब समोर आली आहे.
गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यातील खरीप हंगामातील पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली. नापिकीमुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला.
या पृष्ठभूमीवर दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारकडून सात हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले. त्यानुसार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतही जाहीर करण्यात आली. मदत वाटपाच्या पहिल्या टप्प्यात शासनाकडून दुष्काळग्रस्त जिल्ह्यांना मदत निधीचे वितरण करण्यात आले असून, मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे काम प्रशासनामार्फत सुरू करण्यात आले आहे.
अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना दोन हेक्टर मर्यादेपर्यंत आणि बहुभूधारक शेतकऱ्यांना एक हेक्टर मर्यादेपर्यंत मदतीचे वाटप करण्यात येत आहे. वास्तविक, नापिकीमुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत अल्प, अत्यल्प भूधारक शेतकरी असो, की बहुभूधारक शेतकरी, सर्वांनाच आर्थिक संकटाचा सामना करावा लागत
आहे.
या पृष्ठभूमीवर दुष्काळग्रस्त सर्वच शेतकऱ्यांकरिता मदत वाटपासाठी शेती क्षेत्राची मर्यादा सारखीच असायला हवी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून केली जात असताना, सरकारकडून मात्र अल्प, अत्यल्प आणि बहुभूधारक शेतकऱ्यांमध्ये दुजाभाव केला जात असल्याचा आरोप होत आहे.
दुष्काळग्रस्त बहुभूधारक शेतक-यांवर अन्याय
दुष्काळग्रस्त शेतक-यांना सरकारकडून दिल्या जाणा-या मदतीच्या निकषानुसार अल्प, अत्यल्प भूधारक शेतक-यांना दोन हेक्टर
By admin | Updated: January 29, 2015 01:00 IST2015-01-29T01:00:50+5:302015-01-29T01:00:50+5:30
दुष्काळग्रस्त शेतक-यांना सरकारकडून दिल्या जाणा-या मदतीच्या निकषानुसार अल्प, अत्यल्प भूधारक शेतक-यांना दोन हेक्टर
