नवी दिल्ली : भारतातून चीनला २०२०-२०३० या दशकात जवळपास वार्षिक १४ टक्के या गतीने निर्यात वाढण्याची शक्यता आहे. हा अंदाज एचएसबीसीच्या व्यापार अंदाज अहवालात नमूद करण्यात आला आहे. तसे घडल्यास ही निर्यात कोणत्याही अन्य देशांपेक्षा जास्त असेल व ब्राझीलसह इतर देशांमध्येही निर्यात वार्षिक १० टक्क्यांनी वाढेल.
अहवालात म्हटले आहे की, ‘‘भारतातील नजीकचे भवितव्य हे सकारात्मक असून विकसनशील व विकसित देशांच्या बाजारपेठांच्या तुलनेत भारतातील गुंतवणुकीचा खर्च हा कमी असल्यामुळे भारत आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धक असेल.’’ भारत कच्च्या तेलाचा मोठा आयातदार असल्यामुळे कच्च्या तेलाच्या सध्या खाली आलेल्या किमतीचा त्याला फायदा झाला आहे व त्याचा सकारात्मक परिणाम आगामी काळातही कायम राहील असा अंदाज आहे.
एचएसबीसी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि प्रमुख वाणिज्यिक बँकिंग संदीप उप्पल म्हणाले की,‘‘भारतासाठी आर्थिक संधी चांगल्या आहेत. वाढती लोकसंख्या आणि झपाट्याने वाढणाऱ्या मध्यमवर्गामुळे व्यवसायाला मोठी संधी आहे.’’ एचएसबीसीच्या माहितीनुसार २०१५ मध्ये भारताचा चालू खात्यावरील तोटा कमी होऊन तो सकल देशी उत्पादनाच्या (जीडीपी) ०.६ टक्के असण्याची शक्यता आहे. हा तोटा २०१४ मध्ये १.१ टक्के होता. रिझर्व्ह बँकेने व्याजदरात यावर्षी जानेवारीपासून ०.५ टक्के कपात केली आहे. सकारात्मक वातावरणाचा लाभ भारताच्या अर्थव्यवस्थेला होऊन जीडीपीचा विकासदर २०१४ मध्ये ७.४ टक्के होता, तो वाढून २०१५ मध्ये ७.८ टक्के होईल आणि २०१६ मध्ये ८.३ टक्क्यांवर जाईल. व्यवसाय सुगमतेच्या निकषांवर भारताचे स्थान १८९ देशांमध्ये १२६ वे आहे.
भारताची चीनला निर्यात १४ टक्क्यांनी वाढणार
भारतातून चीनला २०२०-२०३० या दशकात जवळपास वार्षिक १४ टक्के या गतीने निर्यात वाढण्याची शक्यता आहे.
By admin | Updated: May 28, 2015 23:44 IST2015-05-28T23:44:53+5:302015-05-28T23:44:53+5:30
भारतातून चीनला २०२०-२०३० या दशकात जवळपास वार्षिक १४ टक्के या गतीने निर्यात वाढण्याची शक्यता आहे.
