>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २९ - गेल्या तिमाहित भारताच्या आर्थिक वृद्धीचा दर ७.५% वाढला आहे. त्यापूर्वी आर्थिक वृद्धीचा दर ६.६ % इतका असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.
एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातही मार्च २०१५ पासून आर्थिक वृद्धी ७.३ असल्याचे सांगण्यात आले आहे. आर्थिक वर्ष २०१४ - १५ च्या शेवटी आर्थिक वृद्धी ७.३ % झाली असून २०१३ - १४ रोजी आर्थिक वृद्धी ६.९ % इतकी होती. मार्च अखेरीस ७.३ % असलेल्या आर्थिक वृद्धीचा दर अंदाजे ७.४ असल्याचेही वर्तवण्यात येत आहे.