कोल्हापूर : कौशल्य विकास आणि व्यवसाय शिक्षणाला राज्य शासनाने सर्वाेच्च प्राधान्य दिले असून राज्यात कौशल्य विकास कार्यक्रमातून साडेपाच कोटी कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याचा कालबद्ध कार्यक्रम राज्य शासनाने हाती घेतला, असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी येथे केले.
विद्याप्रबोधिनी कोल्हापूर, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभाग आणि यशस्वी इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पेटाळा येथील राम गणेश गडकरी हॉलमध्ये रोजगार, स्वयंरोजगार भरती मेळाव्याचे आयोजन केले होते. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, कौशल्य विकास कार्यक्रमातून तरुणांना रोजगार-स्वयंरोजगाराच्या नवनव्या संधी उपलब्ध करून देण्याची राज्य शासनाची भूमिका आहे. आज देशात तरुणांची मोठी संख्या आहे, या तरुण पिढीचे व्यवसाय शिक्षण तसेच कौशल्य विकास कार्यक्रमातून कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. व्यवसाय शिक्षण आणि कौशल्य विकास कार्यक्रमांतून तरुणांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे काम प्रभावीपणे होेत असून यासाठी राज्य शासनाने कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला आहे. (प्रतिनिधी)
साडेपाच कोटी कुशल मनुष्यबळ निर्माण करणार
कौशल्य विकास आणि व्यवसाय शिक्षणाला राज्य शासनाने सर्वाेच्च प्राधान्य दिले असून राज्यात कौशल्य विकास कार्यक्रमातून साडेपाच कोटी कुशल मनुष्यबळ
By admin | Updated: August 31, 2015 22:24 IST2015-08-31T22:24:53+5:302015-08-31T22:24:53+5:30
कौशल्य विकास आणि व्यवसाय शिक्षणाला राज्य शासनाने सर्वाेच्च प्राधान्य दिले असून राज्यात कौशल्य विकास कार्यक्रमातून साडेपाच कोटी कुशल मनुष्यबळ
