ेसापाचे विष....गोवा
By admin | Updated: June 20, 2014 21:25 IST2014-06-20T21:25:02+5:302014-06-20T21:25:02+5:30

ेसापाचे विष....गोवा
>सापांच्या विषाची गोव्यात मोठ्या प्रमाणात तस्करीएक कोटीचे विष पकडल्याने बिंग उघडकीस : छुपा उद्योग असल्याचे पुन्हा स्पष्टराजेंद्र पां. केरकरकेरी : गोव्यातल्या गुन्हा अन्वेषण खात्याने काल वाळपई-सत्तरी येथे सर्प विषाची तस्करीत गुंतलेल्या महंमद सलिम शेख याला शिताफीने अटक केल्याने सापांच्या विषाची तस्करीच्या अवैध धंद्यात अडकलेल्यांचे बिंग उघडकीस आले. या विषाची किंमत एक कोटी होते, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे. गोव्यात यापूर्वी बर्याचदा अशा धंद्यात गुंतलेल्यांना अटक झाली होती. परंतु असे असताना काहीजण घरात किंवा बागायतीत सापांना पकडून त्यांचे विष काढून त्रयस्थ व्यक्ती किंवा टीळीमार्फत विक्री करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कातड्यांच्या निर्यातीसाठी सापांची जशी भारताच्या अन्य प्रांतात शिकार होते, त्याचप्रमाणे विषासाठी सापांना पकडण्याचा उद्योगही गोव्यात होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.पुणे येथील सिरम इन्स्टट्यिूट, मद्रास येथील किंग इन्स्टट्यिूट आणि विष प्रतिबंधात्मक लस तयार करणार्या बर्याच प्रयोगशाळांना असे विष विकले जायचे. सर्पतज्ज्ञ रॉम व्हिटॅकर यांच्या मते पकडून आणलेले साप मातीच्या थंड मडक्यात ठेवतात. काही वेळाने सापाची मान मागच्या बाजूने पकडून त्याला रबराच्या तक्त्यावर सरळ ठेवतात. त्यावेळी संतापलेला आणि घाबरलेला साप बचावासाठी रबरी तक्त्याला चावतो तेव्हा विष बाहेर येते. ते वाळवून त्याची भुकटी करून ते विकण्यात येते असे म्हटलेले आहे.गोव्यात ऑगस्ट २०१२ मध्ये फोंडा पोलिसांनी अशा तस्करीत गुंतलेल्या टोळीला अटक केली होती. त्यावेळी पोलिसांनी या टोळीकडून सापाच्या विषाची विक्री करण्याच्या प्रयत्नात असताना ९३० मिली लिटर विष जप्त केले होते. गुन्हा अन्वेषण खात्याने नुकत्याच घातलेल्या छाप्यात पोलिसांनी एक लिटर सापाच्या विषासह महंमद शेख याला अटक केली. तो आता गजाआड आहे. या प्रकरणाची नि:पक्ष आणि सापाच्या विषाविषयी शास्त्रीय माहिती असलेल्या तज्ज्ञांच्या मदतीने चौकशी व्हायला पाहिजे. तसे झाले तर साप पकडण्याच्या, त्यांना जीवदान देण्याच्या नावाखाली वावरणार्या गुन्हेगारांचा शोध घेणे शक्य होईल.पुणे पोलिसांनी यापूर्वी शेख याला दोन बाटली सापांच्या विषासह फेब्रुवारीमध्ये अटक केली होती. त्याला पुन्हा एकदा गोव्याच्या गुन्हा अन्वेषण खात्याने अटक खुद्द वाळपईत करण्यात आल्याने या परिसरात वावरत असणार्या टोळीमार्फत त्याने हे कृत्य केले असले पाहिजे. सत्तरीतील म्हादई अभयारण्यात हे राजनाग, नाग, मण्यार, फुरसे, घोणस अशा एकापेक्षा एक जहरी सापांसाठी नैसर्गिक अधिवास असल्याने या गुन्हेगारी टोळीमार्फत सापांचे विष क्रूररितीने काढण्याचे तंत्र अवगत केले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. गुन्हा अन्वेषण खात्याने राष्ट्रीय स्तरावरती वन्य जीव प्रकरणातील गुन्ह्यांचा शोध घेणार्या संस्थेची मदत घेतली तर असा प्रकरणाच्या मुळाकडे जाणे शक्य होईल.चौकटशास्त्रीय जाणकारांचा सहभाग शक्यडिचोली येथील ॲनिमल रेस्क्यू स्क्वॉडचे अमृतसिंग यांनी सांगितले की सापाच्या विषाच्या तस्करीत गुंतलेल्या गुन्हेगारांना अटक करण्याबरोबर त्यांना अशा विषाचा इतक्या मोठ्या प्रमाणात पुरवठा करणार्या स्रोतांचा शोध रितसर करण्याची गरज आहे. सापाचे काढलेले विष विशिष्ट तापमानात साठवून नेले तरच ते उपयुक्त ठरते. त्यामुळे अशा प्रकारे सापाची जी तस्करीच्या व्यवहारात सापांच्या विषाविषयी शास्त्रीय माहिती असलेली मंडळी गुंतलेली असली पाहिजे.