अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने भरघोस उत्पादन देणारे तेलबियांचे सात वाण विकसित केले आहेत; देशात असेच अनेक वाण आहेत; परंतु किफायतशीर भाव मिळत नसल्याने देशातील तेलबिया क्षेत्र व उत्पादन घटले आहे. आता मात्र देशातील तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना स्थैर्य देण्यासाठी केंद्र सरकारने तेलावर आयात शुल्क वाढविण्याचे ठरविले असून यामुळे देशात तेलबिया उत्पादन वाढीस मदत होणार आहे.
देशातील खाद्यतेलाची गरज भागविण्याकरिता सरकारला विदेशातून खाद्यतेलाची आयात करावी लागत आहे. जवळपास १०२ लाख टनापेक्षा अधिक ही आयात केली जाते. यात सर्वाधिक पामतेलाचा भरणा असतो. खाद्यतेलाच्या आयातीवर आपल्याकडे केवळ १० टक्के कर आकारला जात आहे. परिणामी खाद्यतेलाच्या आयातीत वाढ होत असल्याने भारतातील तेलबिया वाणाला बाजारभावच मिळत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांनी तेलबिया वाणाची पेरणी कमी केली आहे. भुईमुगाला किमान चार ते पाच हजार रुपये क्ंिवटल भाव अपेक्षित होता; परंतु हा भाव घसरला, सोयाबीनचे भावदेखील २८०० ते ३२०० रुपये प्रतिक्ंिवटलच्या खाली आले. या दरात उत्पादन खर्चदेखील निघत नसल्याने शेतकऱ्यांनी तेलबिया वाणांचा पेरा कमी केला आहे.
विदर्भातील तेलबिया पिकाचा विचार केल्यास सूर्यफुलाचे क्षेत्र १ लाख २५ हजार हेक्टर होते. ते घसरू न ८ हजार हेक्टरवर आले आहे. करडीचे क्षेत्र ८० हजार हेक्टर होते, तेदेखील १५ हेक्टर खाली आले आहे. खरिपाचा भुईमूग दोन लाख हेक्टरहून झपाट्याने खाली घसरत ६ हजार हेक्टरवर आला आहे.
देशात तेलबिया क्षेत्र वाढविण्यावर भर!
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने भरघोस उत्पादन देणारे तेलबियांचे सात वाण विकसित केले आहेत; देशात असेच अनेक वाण आहेत; परंतु किफायतशीर भाव मिळत
By admin | Updated: August 31, 2015 22:30 IST2015-08-31T22:30:14+5:302015-08-31T22:30:14+5:30
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने भरघोस उत्पादन देणारे तेलबियांचे सात वाण विकसित केले आहेत; देशात असेच अनेक वाण आहेत; परंतु किफायतशीर भाव मिळत
