अमदनगर: नव्याने जाहीर झालेल्या नगरपंचायतींसह नगरपालिकांमध्ये प्रभाग रचना तयार करण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे़ नगरपंचायत व नगरपालिकांच्या हद्दीत वास्तव्यास असलेल्या कुटुंबाचे घरोघरी जावून सर्वेक्षण करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाकडून मंगळवारी दिले असून, त्यानुसार संबंधित प्रशासनाकडून लवकरच सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे़ या सर्वेक्षणानंतर नगरपंचायत व नगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे़जिल्ह्यातील तालुका मुख्यालयांना नगरपालिकांचा दर्जा देण्याची गेल्या अनेक दिवसांची मागणी होती़ आघाडी सरकारच्या काळात जिल्ह्यातील सात प्रस्ताव नगरविकास विभाकडे सादर करण्यात आले होते़ त्यापैकी अकोले, पारनेर आणि कर्जत तालुका मुख्यालयी नगरपंचायत स्थापन करण्यास सरकारकडून हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे़ त्याचबरोबर जामखेड आणि शेवगाव तालुका मुख्यालयास नगरपालिकेचा दर्जा देण्यात आला आहे़ या दोन्ही मुख्यालयांत नगरपालिकांचा कारभार सुरू आहे़ ग्रामपंचायती बरखास्त होऊन नगरपालिका स्थापन झाल्या़ परंतु, कार्यालय आणि कर्मचारी ग्रामपंचायतीचेच आहेत़ नगरपालिकेची स्थापना झाल्याने नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत़ नागरिकांच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सुविधा पुरविण्यास नियोजनाची गरज आहे़ मात्र लोकप्रतिनिधी नसल्याने महत्वाचे निर्णय घेणे अशक्य आहे़ त्यामुळे निवडणुका घेऊन नगरसेवक आणि नगराध्यक्षांच्या निवडी करणे आवश्यक आहे़ परंतु,या निवडीआधी प्रभाग रचना व प्रभागनिहाय आरक्षण जाहीर होणे गरजेचे झाले आहे़ त्यामुळेच राज्य निवडणूक आयोगाने अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिकांची माहिती घेण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत़ सर्वेक्षण करून अहवाल निवडणूक आयोगाला सादर केला जाणार आहे़ जिल्ह्याची २०११ मध्ये जनगणना करण्यात आली आहे़ त्यावेळी अकोले, पारनेर, कर्जत, शेवगाव आणि जामखेड मुख्यालयांचा गावांमध्ये समावेश होता़ त्यामुळे तेथील जनगणना प्रगणक गटानुसार झाली नाही़ या जनगणेनुसार प्रभाग आरक्षण जाहीर करणे शक्य नाही़ त्यामुळे वरील दोन्ही प्रवर्गातील लोकसंख्येची माहिती घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे़ सर्वेक्षण केल्यानंतर नगरपंचायती व नगरपालिकांची प्रभाग संख्या आणि आरक्षण जाहीर करून निवडणुका घेतल्या जातील़ निवडणुकांनंतर खर्या अर्थाने नगरपंचायत व नगरपालिकांचा कारभार सुरू होईल़ निवडणुकांची पूर्वतयारी प्रशासनाकडून सुरू आहे़ मात्र सध्या नगरपंचायत व नगरपालिकांकडे अत्यल्प कर्मचारी आहेत़ त्यामुळे सर्वेक्षणाच्या कामास विलंब होणार असून, निवडणूक प्रक्रिया राबविण्यासही यामुळे उशीर होणार असल्याचे दिसते़
प्रभाग रचनेसाठी कुटुंबनिहाय सर्वेक्षण निवडणूक आयोगाचे आदेश: नवीन नगरपालिका व पंचायतींचा समावेश
अहमदनगर: नव्याने जाहीर झालेल्या नगरपंचायतींसह नगरपालिकांमध्ये प्रभाग रचना तयार करण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे़ नगरपंचायत व नगरपालिकांच्या हद्दीत वास्तव्यास असलेल्या कुटुंबाचे घरोघरी जावून सर्वेक्षण करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाकडून मंगळवारी दिले असून, त्यानुसार संबंधित प्रशासनाकडून लवकरच सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे़ या सर्वेक्षणानंतर नगरपंचायत व नगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे़
By admin | Updated: July 29, 2015 00:42 IST2015-07-29T00:42:33+5:302015-07-29T00:42:33+5:30
अहमदनगर: नव्याने जाहीर झालेल्या नगरपंचायतींसह नगरपालिकांमध्ये प्रभाग रचना तयार करण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे़ नगरपंचायत व नगरपालिकांच्या हद्दीत वास्तव्यास असलेल्या कुटुंबाचे घरोघरी जावून सर्वेक्षण करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाकडून मंगळवारी दिले असून, त्यानुसार संबंधित प्रशासनाकडून लवकरच सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे़ या सर्वेक्षणानंतर नगरपंचायत व नगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे़
