दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला चांगले यश मिळाल्याने भारतामधील आर्थिक सुधारणा वेग घेईल. त्याचप्रमाणे देशाचा विकासदर वाढेल, अशी अपेक्षा गोल्डमन सॅच या आंतरराष्टÑीय आर्थिक सेवा कंपनीने आपल्या अहवालात व्यक्त केली आहे. आंतरराष्टÑीय आर्थिक सेवा कंपनी गोल्डमन सॅचने हा अहवाल शुक्रवारी जाहीर केला. त्यामध्ये वरील अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या आहेत. भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारमुळे देशातील गुंतवणूक वाढण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे. मोदी यांनी गेली १२ वर्षे गुजरातमध्ये विकासाला दिलेले प्रोत्साहन पाहता त्यांच्याकडून भारताच्या विकासाला हातभार लागू शकतो, असे मत अहवालात व्यक्त झाले आहे. गेले काही दिवस थांबलेल्या आर्थिक सुधारणांना भाजपाच्या सत्ताकाळात वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली गेली आहे. त्यामुळे आर्थिक विकासालाही वेग मिळून देशाचा विकासदर वाढण्याची अपेक्षा या अहवालात वर्तविण्यात आली आहे. यावर्षी कमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याने विकासदर फारसा वाढू शकणार नाही, असे या अहवालात म्हटले आहे. पुरवठ्यामध्ये सुधारणा करणे, आर्थिक तूट कमी करणे, गुंतवणुकीत वाढ करण्याकडे लक्ष पुरविणे आणि सरकारच्या कामगिरीत सुधारणा करणे हे विषय सरकारच्या अजेंड्यावर आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क) स्थिर सरकारमुळे देशाच्या विकासाला हातभार लागण्याची शक्यता अहवालात व्यक्त केली गेली आहे.
आर्थिक सुधारणांना आता येईल वेग
लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला चांगले यश मिळाल्याने भारतामधील आर्थिक सुधारणा वेग घेईल.
By admin | Updated: May 26, 2014 00:48 IST2014-05-26T00:47:14+5:302014-05-26T00:48:34+5:30
लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला चांगले यश मिळाल्याने भारतामधील आर्थिक सुधारणा वेग घेईल.
