मुंबई : केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पात वाहनांच्या स्वरूपानुसार त्यांच्यावर अधिभार लावण्याची घोषणा केल्यानंतर आता वाहन कंपन्यांनी गाड्यांच्या किमती वाढविण्याच्या घोषणा सुरू केल्या आहेत, याची सुरुवात ह्युंदाई कंपनीने अर्थसंकल्प मांडल्यानंतर काही तासांतच करत वाहनाच्या श्रेणीनुसार किमान तीन हजार रुपये ते ८० हजार रुपये अशी वाढ जाहीर केली आहे. तर पाठोपाठ आता मंगळवारी टाटा मोटर्सनेही आपल्या प्रवासी वाहनांच्या किमतीमध्ये दोन हजार ते ३५ हजार रुपये इतकी वाढ करण्याची घोषणा केली आहे.
वास्तविक अर्थसंकल्पातील घोषणा आणि त्या अनुषंगाने होणारी कर आकारणी ही नव्या आर्थिक वर्षापासून अर्थात एक एप्रिल २०१६ पासून लागू होतात. परंतु, या तरतुदी लागू होण्यापूर्वीच वाहन कंपन्यांनी गाड्यांच्या किमतीमध्ये वाढ करत वाहन कंपन्यांनी अखेर ग्राहकांना वेठीला धरल्याचे दिसत आहे.
वाहनअभ्यासक विवेक श्रीनिवासन यांच्यामते, गेल्या दोन वर्षांपासून स्पोर्टस् युटिलिटी व्हेअिकल श्रेणीतील गाड्यांचा ट्रेन्ड मोठ्या प्रमाणावर आहे. किंबहुना, लोकांमधील वाढती मागणी लक्षात घेत आजच्या घडीला सर्वच वाहन कंपन्यांनी स्पोर्टस् युटिलिटी श्रेणीतील मॉडेल्स बाजारात आणली आहेत. याकरिता अनेक कंपन्यांनी गाडयांच्या निर्मितीसाठी असेम्ब्ली लाईनसाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. मात्र, सरकारच्या या निर्णयाचा सर्वात मोठा फटका हा याच श्रेणीतील वाहनांना बसणार आहे. त्यामुळे स्वाभाविकच आता याचा परिणाम हा वाहन उद्योगावर होणार
आहे.
वास्तविक कोणताही उपकर न लावण्याची किंबहुना, हायब्रीड आणि पर्यावरण स्नेही गाड्यांच्या निर्मितीसाठी सरकारने काही प्रोत्साहनात्मक घोषणा करण्याची वाहन उद्योगाला अपेक्षा होती, ती फोल ठरली.
टाटा मोटर्सच्या प्रवक्त्याने सांगितले की, ही वाढ तात्काळ लागू होणार आहे. टाटा मोटर्स प्रवेश पातळीवरील नॅनोपासून प्रिमियम क्रॉसओव्हर एरिया सारख्या गाड्या विकते. या गाड्यांची दिल्लीतील शोरुममधील किंमत २.0४ लाख ते १५.७९ लाख रुपये आहे. (वृत्तसंस्था )
करामुळे वाहने महागली
केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पात वाहनांच्या स्वरूपानुसार त्यांच्यावर अधिभार लावण्याची घोषणा केल्यानंतर आता वाहन कंपन्यांनी गाड्यांच्या किमती वाढविण्याच्या घोषणा सुरू केल्या आहेत
By admin | Updated: March 2, 2016 02:45 IST2016-03-02T02:45:18+5:302016-03-02T02:45:18+5:30
केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पात वाहनांच्या स्वरूपानुसार त्यांच्यावर अधिभार लावण्याची घोषणा केल्यानंतर आता वाहन कंपन्यांनी गाड्यांच्या किमती वाढविण्याच्या घोषणा सुरू केल्या आहेत
