नवी दिल्ली : खुल्या बाजारात तांदळाच्या वाढत्या भावामुळे ग्राहक याची मागणी कमी करत आहेत. ग्राहकांना नियंत्रित किमतीत याची खरेदी करण्यासाठी रास्त भाव दुकानांवर अवलंबून राहावे लागत आहे. एका सरकारी सर्वेक्षणात ही बाब दिसून आली आहे.
राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय अर्थात एनएसएसओने वस्तू आणि सेवा यांच्या देशातील मागणीवर सर्वेक्षण केले. यानुसार, ६८ व्या फेरीत भारतीयांनी प्रतिकुटुंबामागे २०११-१२ मध्ये कमी भात खाल्ल्याचे दिसून आले. मात्र, ग्रामीण भागात सार्वजनिक वितरण प्रणाली अर्थात पीडीएसच्या माध्यमातून तांदळाची खरेदी दुपटीने वाढली आहे. शहरी भागातही यात ६६ टक्क्यांची वाढ नोंदली गेली. सर्वेक्षणानुसार, २०११-१२ यादरम्यान गावांमध्ये प्रतिव्यक्ती दरमहा तांदळाची मागणी ५.९८ किलोग्रॅम एवढी राहिली. २००४-०५ मध्ये ही मागणी ६.३८ किलो एवढी होती. दुसरीकडे शहरी भागात तांदळाची प्रतिव्यक्ती दरमहा मागणी कमी होऊन २०११-१२ मध्ये ४.४९ किलो एवढी झाली. २००४-०५ मध्ये ही ४.७१ किलो एवढी होती.
तथापि, या अभ्यासानुसार गावांमध्ये सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे तांदळाची प्रतिव्यक्ती मागणी वाढून दुप्पट झाली आहे. शहरांमध्ये २००४-०५ च्या तुलनेत यात ६६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचा अर्थ रेशन दुकानातून तांदूळ खरेदीत उल्लेखनीय वाढ झाली आहे.
एनएसएसओचे हे सर्वेक्षण २०११-१२ या काळात करण्यात आले. यात ७,४६९ गावे आणि ५,२६८ शहरांतील १,०१,६५१ कुटुंबांकडून माहिती संकलित करण्यात आली. त्यातून हा निष्कर्ष काढण्यात आला.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
तांदळाची मागणी घटतेय
खुल्या बाजारात तांदळाच्या वाढत्या भावामुळे ग्राहक याची मागणी कमी करत आहेत. ग्राहकांना नियंत्रित किमतीत याची खरेदी करण्यासाठी रास्त भाव दुकानांवर अवलंबून राहावे लागत आहे
By admin | Updated: July 14, 2014 01:11 IST2014-07-14T01:11:25+5:302014-07-14T01:11:25+5:30
खुल्या बाजारात तांदळाच्या वाढत्या भावामुळे ग्राहक याची मागणी कमी करत आहेत. ग्राहकांना नियंत्रित किमतीत याची खरेदी करण्यासाठी रास्त भाव दुकानांवर अवलंबून राहावे लागत आहे
