Lokmat Money > बिझनेस न्यूज > हिंसाचारामुळे काश्मिरातील व्यवसायाचे ६ हजार कोटींचे नुकसान

हिंसाचारामुळे काश्मिरातील व्यवसायाचे ६ हजार कोटींचे नुकसान

गेल्या ४५ दिवसांपासून धुमसत असलेल्या हिंसाचारामुळे काश्मिरात ६ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय बुडाला आहे.

By admin | Updated: August 25, 2016 06:42 IST2016-08-25T06:42:26+5:302016-08-25T06:42:26+5:30

गेल्या ४५ दिवसांपासून धुमसत असलेल्या हिंसाचारामुळे काश्मिरात ६ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय बुडाला आहे.

6,000 crores loss of business in Kashmir due to violence | हिंसाचारामुळे काश्मिरातील व्यवसायाचे ६ हजार कोटींचे नुकसान

हिंसाचारामुळे काश्मिरातील व्यवसायाचे ६ हजार कोटींचे नुकसान


श्रीनगर : गेल्या ४५ दिवसांपासून धुमसत असलेल्या हिंसाचारामुळे काश्मिरात ६ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय बुडाला आहे. त्यामुळे व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. काश्मीर ट्रेडर्स अँड मॅन्युफॅक्चरर्स फेडरेशनचे अध्यक्ष मोहंमद यासीन खान यांनी सांगितले की, ‘४६ दिवस काश्मिरात असलेल्या संचारबंदीमुळे येथील व्यापार उदीम धारातीर्थी पडला आहे. दररोज १३५ कोटी रुपयांचा व्यवसाय बुडत आहे. एकूण नुकसान ६ हजार कोटींपेक्षाही जास्त असेल. आम्ही आतापर्यंतच्या सर्वांत वाईट आर्थिक संकटाचा सामना करीत आहोत. हे पुन्हा-पुन्हा घडत आहे. यावर काहीतरी कायमस्वरूपी तोडगा हवा. तोडगा राजकीयच हवा. आमच्या प्रिय व्यक्तींना गमावणे हे आणखी मोठे दु:ख आहे. हे थांबायला हवे.’
सूत्रांनी सांगितले की, ‘काश्मिरात फळबागांपासून ते अतिथ्य व्यवसायापर्यंत सर्वकाही ठप्प झाले आहे. हॉटेलांत शुकशुकाट आहे. हाउसबोटी आणि शिकारे रिकामे आहेत. प्रसिद्ध काश्मिरी गालिचे आणि शाली ग्राहकांविना पडून आहेत. वाहतूक व्यवसायातील वाहने उभी आहेत.’ एका व्यावसायिकाने सांगितले की, ‘भारतातील एकूण सफरचंदापैकी ७ टक्के सफरचंद काश्मिरातून जातात. फळे काढायला आली आहेत, पण ती काढता येत नाहीत. शेतकऱ्यांनी आपले मजूर घराकडे पाठवून दिले आहेत. सोपोर, तारजू आणि अनंतनाग येथील स्थिती वाईट आहे.’
काश्मीर चेंबर आॅफ कॉमर्सचे सचिव फैज बक्षी यांनी सांगितले की, ‘काश्मीरवर आता कायमस्वरूपी तोडगा निघाला पाहिजे.’ पाण्याचा व्यवसाय करणारा अब्दुर रऊफ भट याने सांगितले की, ‘बुऱ्हाण वाणीच्या खात्म्यापूर्वी मी दररोज १,५00 पाणी जार विकीत होतो. आता फक्त ५0 जार विकतात. मी कामगारांना ५0 टक्के वेतनही देऊ शकत नाही.’ वॉटरप्रूफिंगचा व्यवसाय करणारा बशरत अहमद म्हणाला की, ‘ग्राहकांनी दिलेले माझे पाच चेक बाउन्स झाले आहेत. माझे पैसे अडकले आहेत. मी कर्ज घेऊन ठेवले आहे. मी आता अडकलो आहे.’ (वृत्तसंस्था)
>महापुरापेक्षाही मोठे नुकसान झाल्याचा दावा
जम्मूमधील १,000 ते १,५00 कोटींचा व्यवसाय या काळात बुडाला असल्याचे जम्मू चेंबर आॅफ कामर्स अँड इंडस्ट्रीजने म्हटले आहे. दोन वर्षांपूर्वी काश्मिरात महापूर आला होता. त्यात ५,४00 कोटी ते ५,७00 कोटी बुडाले होते. त्यानंतरचे हे सर्वांत मोठे संकट ठरले आहे.

Web Title: 6,000 crores loss of business in Kashmir due to violence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.