नवी दिल्ली : भारतातून २००४-२०१३ या काळात ५०५ अब्ज डॉलर देशाबाहेर गेले काय? असा सवाल एसआयटीने केला आहे. काळ्या पैशांच्या संदर्भात ही समिती उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नेमण्यात आली आहे.
एसआयटीने याबाबत डीआरआय (डिरेक्टर आॅफ रेव्हेन्यू इंटिलिजन्स) यांना विचारणा केली आहे. तथापि, याबाबत माहिती घ्या अशा सूचनाही केल्या आहेत. दरम्यान, अमेरिकेतील ग्लोबल फायनान्स इंटेग्रिटीने याबाबत एक अहवाल सादर केला आहे. यात म्हटले आहे की, काळा पैसा बाहेर पाठविण्याबाबत भारत जगातील चार क्रमांकाचा देश आहे. २००४- २०१३ या काळात देशातून दरवर्षी ५१ अब्ज डॉलर एवढी रक्कम देशाबाहेर गेली आहे. या पार्श्वभूमीवर एसआयटीने उपस्थित केलेल्या प्रश्नांना महत्त्व आले
आहे.
अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे की, या कालावधीत दरवर्षी बाहेर पाठविण्यात आलेल्या काळ्या पैशांबाबत एसआयटीने ग्लोबल फायनान्शियल इंटेग्रिटीकडून माहिती घेतली आहे. ही माहिती आठ फेब्रुवारीला डीआरआयला पाठविण्यात आली आहे. अर्थात ही माहिती किती खरी आहे याबाबत खातरजमा करण्याबाबत सुचविण्यात आले आहे. कारण, यासारख्या अहवालांची सत्यता तपासून पाहणे गरजेचे आहे. डीआरआयचा अहवाल मिळाल्यानंतरच एसआयटी आवश्यक ते पाऊल उचलणार असल्याचेही सांगण्यात आले.
५०५ अब्ज डॉलर भारतातून बाहेर गेले?
भारतातून २००४-२०१३ या काळात ५०५ अब्ज डॉलर देशाबाहेर गेले काय? असा सवाल एसआयटीने केला आहे. काळ्या पैशांच्या संदर्भात ही समिती उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नेमण्यात आली आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2016 03:23 IST2016-02-16T03:23:47+5:302016-02-16T03:23:47+5:30
भारतातून २००४-२०१३ या काळात ५०५ अब्ज डॉलर देशाबाहेर गेले काय? असा सवाल एसआयटीने केला आहे. काळ्या पैशांच्या संदर्भात ही समिती उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नेमण्यात आली आहे.
