नगपूर: विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत विभागातील सहा जिल्हे मिळून सरासरी ३८.८५ टक्के मतदान झाले. २ लाख ८७ हजार मतदारांपैकी १ लाख ११,५०० मतदारांनी (३८.८५ टक्के) मतदानाचा हक्क बजावला. २००८ च्या निवडणुकीच्या (२००८मध्ये ५२ टक्के) तुलनेत १४ टक्के मतदान कमी झाले. विशेष म्हणजे मतदार वाढूनही मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे. एकूण १४ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून २४ तारखेला मतमोजणी होणार आहे.मतदानादरम्यान यादीत नावे नसल्याच्या तक्रारी वगळता इतर कुठलीही अनुचित घटना घडली नाही. मतदान शांततेत पार पडले, असे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले.मतदारसंघातील नागपूरसह चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यात सकाळी ८ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली. दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान चालले. नागपूर शहरात सकाळी पहिल्या टप्प्यात मतदानाला जोर होता. केंद्रावर रांगाही होत्या. विशेषत: महिला मतदारांची संख्या लक्षणीय होती. त्यानंतर जसजसे उन्ह वाढत गेले त्याचा परिणाम मतदानावरही होत गेला व दुपारी १२ ते ३ या दरम्यान संथगतीने मतदान झाले. त्यानंतर शेवटच्या टप्प्यात पुन्हा केंद्रावर गर्दी झाली. मात्र एकूणच मतदानात उत्साह दिसून आला नाही. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून दिलेल्या माहितीनुसार दुपारी ४ वाजेपर्यंत मतदारसंघात सरासरी ३८.८५ टक्के मतदानाची नोंद झाली होती. (प्रतिनिधी)जिल्हानिहाय मतदान जिल्हा टक्केवारीनागपूर ४२%वर्धा २६.३९%भंडारा ४२.७१%गोंदिया ४३.७७ %चंद्रपूर ३२.१४%गडचिरोली ३५.८६%
मतदानाबाबत पदवीधर अनुत्सुक ३८ टक्के मतदान: २४ ला मतमोजणी
नागपूर: विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत विभागातील सहा जिल्हे मिळून सरासरी ३८.८५ टक्के मतदान झाले. २ लाख ८७ हजार मतदारांपैकी १ लाख ११,५०० मतदारांनी (३८.८५ टक्के) मतदानाचा हक्क बजावला. २००८ च्या निवडणुकीच्या (२००८मध्ये ५२ टक्के) तुलनेत १४ टक्के मतदान कमी झाले. विशेष म्हणजे मतदार वाढूनही मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे. एकूण १४ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून २४ तारखेला मतमोजणी होणार आहे.
By admin | Updated: June 20, 2014 21:24 IST2014-06-20T21:24:55+5:302014-06-20T21:24:55+5:30
नागपूर: विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत विभागातील सहा जिल्हे मिळून सरासरी ३८.८५ टक्के मतदान झाले. २ लाख ८७ हजार मतदारांपैकी १ लाख ११,५०० मतदारांनी (३८.८५ टक्के) मतदानाचा हक्क बजावला. २००८ च्या निवडणुकीच्या (२००८मध्ये ५२ टक्के) तुलनेत १४ टक्के मतदान कमी झाले. विशेष म्हणजे मतदार वाढूनही मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे. एकूण १४ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून २४ तारखेला मतमोजणी होणार आहे.
