रोम/नवी दिल्ली : भारतात तब्बल १९४ दशलक्ष (१९.४ कोटी) लोक उपासमारीचा सामना करीत असल्याचा धक्कादायक अहवाल संयुक्त राष्ट्रांनी जारी केला आहे. उपासमारीच्या बाबतीत भारताने चीनलाही मागे टाकल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
१९९०-१९९२ मध्ये पूर्व आशियात एक अब्ज भुकेले लोक होते. ती संख्या २०१४-२०१५ मध्ये ७९५ दशलक्ष एवढी खाली आली. ही संख्या कमी होण्याचे श्रेय चीनला जाते, असे संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने (एफएओ) आपल्या ‘द स्टेट आॅफ फूड इनसिक्युरिटी इन द वर्ल्ड २०१५’ या मथळ्याच्या अहवालात म्हटले आहे. भारतातही भुकेल्या लोकांची संख्या १९९० आणि २०१५ या कालावधीत घटली आहे.
भारतात १९९०-१९९२ मध्ये भुकेल्यांची संख्या २१०.१ दशलक्ष होती, ती २०१४ -२०१५ मध्ये १९४.६ दशलक्षांपर्यंत कमी झाली. भारताने एकूण लोकसंख्येमध्ये सगळ्यांना अन्न उपलब्ध होईल यासाठी मोठे प्रयत्न केले तरीही आज तेथे १९४ दशलक्ष लोक भुकेले आहेत. भारत भूक आणि दारिद्र्य कमी करण्याचे अनेक सामाजिक उपक्रम सुरूच ठेवील अशी अपेक्षाही संयुक्त राष्ट्रांच्या या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. भारतापेक्षा चीनने भुकेल्या लोकांची संख्या कमी करण्यासाठी चांगले प्रयत्न केले. तेथे १९९०-१९९२ मध्ये भुकेले लोक २८९ दशलक्ष होते ते २०१४-२०१५ मध्ये १३३.८ दशलक्षांवर आले.
लॅटिन अमेरिका, कॅरेबियन, दक्षिणपूर्व आणि मध्य आशिया, तसेच अफ्रिकेच्या काही भागांनी भुकेल्या लोकांची संख्या कमी करण्यासाठी लक्षात येतील असे प्रयत्न केल्याचे हा अहवाल म्हणतो. (वृत्तसंस्था)
४ संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने (एफएओ) अन्नाच्या बाबतीत असुरक्षित असलेल्या १२९ देशांवर देखरेख ठेवलेली होती.
४ मिलेनियम डेव्हलपमेंट गोल अंतर्गत अपोषित लोकांच्या संख्येवर २0१५ मध्ये नियंत्रण मिळविण्याचे लक्ष्य त्यांना देण्यात आले होते. १२९ पैकी ७२ देशांनी हे लक्ष्य गाठले आहे.
४ १९९६ साली झालेल्या जागतिक अन्न परिषदेतील महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे साध्य करण्यात २९ देशांनी यश मिळविले आहे.
४ सर्वांना सामावून घेणारी आर्थिकवाढ, शेती व्यवसायात गुंतवणूक, सामाजिक संरक्षण व राजकीय स्थैर्यामुळे भुकेचे निर्मूलन शक्य असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
भारतात १९.४ कोटी लोकांची उपासमार
भारतात तब्बल १९४ दशलक्ष (१९.४ कोटी) लोक उपासमारीचा सामना करीत असल्याचा धक्कादायक अहवाल संयुक्त राष्ट्रांनी जारी केला आहे.
By admin | Updated: May 28, 2015 23:46 IST2015-05-28T23:46:17+5:302015-05-28T23:46:17+5:30
भारतात तब्बल १९४ दशलक्ष (१९.४ कोटी) लोक उपासमारीचा सामना करीत असल्याचा धक्कादायक अहवाल संयुक्त राष्ट्रांनी जारी केला आहे.
