नीरा खोऱ्यातील धरणावर जोरदार पाऊस पडत आहे. सर्व धरणांमधीलपाणीसाठा वाढत आहे. मंगळवार, दि. १७ जून रोजी नीरा खोऱ्यातील गुंजवणी, नीरा देवघर, वीर, भाटघर धरणावर जोरदार पाऊस पडत आहे.
चारही धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून सरासरी १८.२६ टक्के, ८.८२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत ४.१७ टक्के अधिक पाणीसाठा झाला आहे.
नीरा डावा व उजवा कालव्याचे पाणी बंद आहे. गेल्या २४ तासांत नीरा खोऱ्यातील सर्व धरणांत ०.६५ टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे. वीर धरण ५० टक्के भरले आहे.
यामुळे फलटण, माळशिरस, पंढरपूर, सांगोला लाभक्षेत्रातील सर्वसामान्य नागरिक सुखावला असून, शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
अधिक वाचा: राज्यात ११.७० लाख हेक्टरवर खरीप पेरण्या; कोणत्या पिकाची झाली सर्वाधिक पेरणी?