मालेगाव : नाशिक व जळगाव जिल्ह्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या नार-पार-गिरणा नदी जोड प्रकल्पाला शासनस्तरावरील समितीने हिरवा कंदील दिला आहे. सुमारे ४,११६.१० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया यापूर्वीच पूर्ण झाली असून, त्यास आता अधिकृत मान्यता मिळाल्याने पुढील कार्यवाहीला वेग येणार आहे.
शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून लवकरच कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) जारी करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातून सुमारे १०.६४ द.ल.घ.फू. पाणी उपलब्ध होणार असून, नाशिक व जळगाव जिल्ह्यांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा दिलासा मिळणार आहे. याशिवाय अंदाजे १ लाख २३ हजार ७९० एकर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
दरम्यान, प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याबाबत जलसंपदा विभागाकडून सविस्तर अभ्यास सुरू असून, या टप्प्यातून आणखी २०.६६ द.ल.घ.फू. पाणी उपलब्ध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे लवकरच संबंधित मंत्री, स्थानिक नागरिक व शेतकरी यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा पार पडणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
दहावीचा निकाल लवकरच, अकरावी ॲडमिशनसाठी कुठली कागदपत्रे लागतात, 'ही' कागदपत्रे तयार ठेवा!
