जळगाव : नाशिकमधील जोरदार पावसाने 'गिरणा' धरणाला (Girana Dam) बुस्टर द्यायला सुरुवात केली आहे. जिल्ह्यात दमदार पाऊस नसताना जून महिन्यात गिरणा धरणातील जलसाठ्यात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या गिरणा धरणात ३१.२८ टक्के इतका जलसाठा आहे.
३१ मेपर्यंत गिरणा धरणातील जलसाठा २१ टक्क्यांवर आला होता. जूनच्या मध्यान्हानंतर नाशिक जिल्ह्यात (Nashik rain) जोरदार पाऊस झाल्याने गिरणातील साठा २८ टक्क्यांवर पोहोचला. सद्यपरिस्थितीत जिल्ह्यात सर्वाधिक जलसाठा सुकी प्रकल्पात आहे. या प्रकल्पात सध्या ८९.०१ टक्के इतका साठा आहे. त्यापाठोपाठ वाघूर धरणात (६५.२०), मोर मध्ये (६२.७१) जलसाठा उपलब्ध आहे.
तीन धरणे शून्यावर
भोकरबारी, बोरीसह अग्नावती धरणातील जलसाठा सरत्या जूनमध्ये ही शून्यावर आहे. तर हिवरा (२.७६), तोंडापूर (६.९१) धरणातही जलसाठा अत्यल्प आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यातील प्रकल्पातील जलसाठा २४.४२ इतका होता. यंदा मात्र हा जलसाठा ३५.७१ टक्क्यांवर आहे. त्यामुळे गतवर्षाच्या तुलनेत यंदा समाधानकारक जलसाठा उपलब्ध आहे.
'हतनूर'चे १० दरवाजे उघडले
सद्यस्थितीत हतनूर धरणाचे १० दरवाजे एका मीटरने उघडे करण्यात आले आहेत. तर शेळगाव बॅरेजचे ७ दरवाजे २ मीटरने उघडे करण्यात आले आहेत. त्यामुळे