Join us
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा; १६ जिल्ह्यांत यलो अलर्ट, गारपिटीची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 13:44 IST

Maharashtra Weather Update : राज्यात पुढील २४ तास हवामान धोकादायक राहण्याची शक्यता असून गारपीट आणि अवकाळी पावसाचा इशारा IMD ने देण्यात आला आहे.(Maharashtra Weather Update)

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा एकदा हवामानात मोठा बदल होत असून ४ एप्रिल २०२६ रोजी हवामान विभागाने (IMD) अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यांचा इशारा दिला आहे. (Maharashtra Weather Update)

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील सुमारे १६ जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी करण्यात आला असून काही ठिकाणी गारपिटीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे शेती पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. (Maharashtra Weather Update)

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाडा आणि विदर्भ भागात अवकाळी पावसाचा प्रभाव अधिक राहणार आहे. या भागांत ढगाळ वातावरणासह अधूनमधून पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

तसेच पुणे, अहमदनगर, जळगाव, नाशिक आणि सांगली जिल्ह्यांतही वादळी वाऱ्यासह पाऊस पडू शकतो. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह ताशी ३० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

राज्यातील काही भागांत गारपीट होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. रब्बी हंगामातील गहू, हरभरा तसेच द्राक्ष, आंबा यांसारख्या फळबागांना याचा मोठा फटका बसू शकतो.

सध्या अनेक ठिकाणी काढणीचा हंगाम सुरू असल्याने तयार पिकांचे नुकसान होण्याची भीती अधिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिके सुरक्षित ठिकाणी साठवणे, तसेच शक्य असल्यास झाकून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

५ एप्रिलपासून पावसाची तीव्रता काहीशी कमी होण्याची शक्यता आहे. मात्र ७ एप्रिलपासून पुन्हा एक नवीन पश्चिमी विक्षोभ सक्रिय होणार असल्याने हवामानात पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस वातावरण अस्थिर राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

मुंबई आणि कोकण भागात हवामान तुलनेने स्थिर राहणार असून येथे पावसाची शक्यता कमी आहे. मात्र आंशिक ढगाळ वातावरण राहील आणि कमाल तापमान ३२ ते ३६ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.

या जिल्ह्यांना यलो अलर्ट

मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर, नाशिक, जळगाव, सांगली

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड

विदर्भातील नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

शेतकऱ्यांना सल्ला

* वादळी वाऱ्याच्या वेळी झाडांखाली किंवा कच्च्या घरांत आश्रय घेणे टाळावे.

* विजांच्या कडकडाटाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी थांबावे.

* शेतकऱ्यांनी काढणीला आलेली पिके, धान्य आणि फळे सुरक्षित ठिकाणी ठेवावीत.

* हवामान विभागाच्या पुढील सूचना लक्षात घेऊन आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Alert : अरबी समुद्रातून धडकणारं 'हे' संकट महाराष्ट्राला झोडपणार; पाहा तुमच्या जिल्ह्याची स्थिती

अधिक वाचा : Cotton Farming : कापूस कोंड्याला सोन्याचं कोंदण; आता अंजनगाव सुर्जीत होणार 'गारमेंट क्लस्टर'

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Weather Alert: Unseasonal Rain, Yellow Alert in 16 Districts

Web Summary : Maharashtra faces unseasonal rain. A yellow alert is issued for 16 districts with potential hailstorms. Farmers are advised to protect crops as unstable weather continues. Mumbai and Konkan will have stable weather.
टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजमहाराष्ट्रकोकणविदर्भमराठवाडा